शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

चंद्रपूरकरांना हवा आमुलाग्र विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला ८०० वर्षांचा इतिहास आहे. हे शहर आता खूप बदलले. कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे. मंचावर खासदार बाळू धानोकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व आयोजक  रामू तिवारी, पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे, इको प्रोचे बंडू धोतरे, प्रा. श्याम हेडाऊ व  अन्य उपस्थित होते.  

अतिक्रमणाकडे वेधले लक्ष- शुद्ध पाण्याचा शहराचा इतिहास आहे. मात्र, आज पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. युरोपातील नद्या बघण्यासाठी नागरिक जातात. मात्र, अजूनही येथील नद्यांचे शुद्धीकरण झाले नाही. रामाळा तलावाचे संवर्धन व्हावे, अतिक्रमण हटवावे व त्यावर उपाययोजना शोधावी. सोलरला प्राधान्य देत सायकल सीटीसाठी पुढाकार घ्यावा, याकडे प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे यांनी लक्ष वेधले. 

सर्व राजकीय पक्षांनी तयार करावा अजेंडा प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्र सुरु करावे, अग्निशमन वाहने जाण्याएवढे रस्ते तयार करावे, आदी सूचना बंडू धोतरे यांनी केल्या. मकसूद शेख यांनी वडगाव व तुकूम प्रभागात स्मशानभूमीची मागणी केली. प्रा. श्याम हेडाऊ यांनी सर्व राजकीय पक्षांनी शहराचा पंचवार्षिक आराखडा तयार करावा, असे आवाहन केले.

यांनी मांडले विकासाचे व्हिजन...चंद्रपूरच्या विकासासाठी नियोजन कसे असावे, याबाबत  भाविक येरगुडे, विजय खनके, शैलेश जुमडे, मनोहर रामटेके, प्रमोद बोरीकर, दामोदर सारडा, वनश्री मेश्राम, राकेश मार्कंडेवार, अजय दुबे, मकसूद खान, सुनीता अग्रवाल, अलका मोटघरे, निमेश मानकर आदींनी व्हिजन मांडले. 

काय व्हायला पाहिजे ? - पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही. वाहतूक समस्या दूर करावी, मिनी बससेवा, किल्ल्यांभोवती रिंगरोड, विविध ठिकाणी बाजाराची सुविधा, वृक्षलागवड, भूमिगत वीज वाहिनी व वास्तू संग्रहालयाची आवश्यकता आहे. सर्वांनी एकत्रित आल्यास स्थिती बदलेल, असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस