शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरकरांना हवा आमुलाग्र विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 05:00 IST

कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला ८०० वर्षांचा इतिहास आहे. हे शहर आता खूप बदलले. कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे. मंचावर खासदार बाळू धानोकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व आयोजक  रामू तिवारी, पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे, इको प्रोचे बंडू धोतरे, प्रा. श्याम हेडाऊ व  अन्य उपस्थित होते.  

अतिक्रमणाकडे वेधले लक्ष- शुद्ध पाण्याचा शहराचा इतिहास आहे. मात्र, आज पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. युरोपातील नद्या बघण्यासाठी नागरिक जातात. मात्र, अजूनही येथील नद्यांचे शुद्धीकरण झाले नाही. रामाळा तलावाचे संवर्धन व्हावे, अतिक्रमण हटवावे व त्यावर उपाययोजना शोधावी. सोलरला प्राधान्य देत सायकल सीटीसाठी पुढाकार घ्यावा, याकडे प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे यांनी लक्ष वेधले. 

सर्व राजकीय पक्षांनी तयार करावा अजेंडा प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्र सुरु करावे, अग्निशमन वाहने जाण्याएवढे रस्ते तयार करावे, आदी सूचना बंडू धोतरे यांनी केल्या. मकसूद शेख यांनी वडगाव व तुकूम प्रभागात स्मशानभूमीची मागणी केली. प्रा. श्याम हेडाऊ यांनी सर्व राजकीय पक्षांनी शहराचा पंचवार्षिक आराखडा तयार करावा, असे आवाहन केले.

यांनी मांडले विकासाचे व्हिजन...चंद्रपूरच्या विकासासाठी नियोजन कसे असावे, याबाबत  भाविक येरगुडे, विजय खनके, शैलेश जुमडे, मनोहर रामटेके, प्रमोद बोरीकर, दामोदर सारडा, वनश्री मेश्राम, राकेश मार्कंडेवार, अजय दुबे, मकसूद खान, सुनीता अग्रवाल, अलका मोटघरे, निमेश मानकर आदींनी व्हिजन मांडले. 

काय व्हायला पाहिजे ? - पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही. वाहतूक समस्या दूर करावी, मिनी बससेवा, किल्ल्यांभोवती रिंगरोड, विविध ठिकाणी बाजाराची सुविधा, वृक्षलागवड, भूमिगत वीज वाहिनी व वास्तू संग्रहालयाची आवश्यकता आहे. सर्वांनी एकत्रित आल्यास स्थिती बदलेल, असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस