शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

त्यांचा संसार सुरूच झाला नाही! वरात घेऊन निघताच नवरदेवाचं निधन; दोन्ही कुटुंबांवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 13:11 IST

लग्नसोहळ्यानंतर निघालेल्या नवरदेवाचा मृत्यू; दोन्ही कुटुंबांना जबर धक्का

चंद्रपूर: लग्न म्हणजे सात जन्मांचं बंधन. सामाजिक चालीरीतीनुसार माणूस विवाह बंधनात बांधल्या जाऊन संसाररुपी गाडा चालवतो. कधीकधी पती-पत्नी दोघेही एकमेकांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतात, तर कोणी मध्येच साथ सोडतात. अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना आवळगावात गुरुवारी घडली. लग्न लागले. वरातीचे जेवण झाले. नववधूला घेऊन नवरदेव वाहनात बसल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबासह वऱ्हाडीही हादरले. नाजूक अभिमन्यू पोहनकर असे मृत नवरदेवाचे नाव आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपाली नामक युवतीशी गुरुवारी ठरला होता. नाजूक हे कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करत मोजकेच वऱ्हाडी घेऊन लग्नासाठी आवळगावला वधुमंडपी पोहचले.  सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आनंदाच्या वातावरणात नाजूक व दीपालीचा विवाह सोहळा पार पडला.  "जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा"; दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्यादुपारी तीन वाजताच्या दरम्यान रितीरिवाजानुसार नवरदेव नाजूक वधूला स्वगावी नेण्यासाठी वधूसह मोटारीत बसला. अशातच अचानक नावदेवाची प्रकृती बिघडली. लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला. ब्रह्मपुरी वरून आरमोरीला  नेत असता रस्त्यातच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. ही वार्ता एकताच सहजीवनाचे स्वप्न रंगवत असलेल्या दीपालीच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.