शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्षात चंद्रपूर देशात अग्रस्थानी ! वर्षभरात ४७ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:52 IST

Chandrapur : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शंकरपूर : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर विविध कारणांमुळे १२ वाघ व ५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. या आकडेवारीमुळे चंद्रपूर जिल्हा मानव-वन्यजीव संघर्षाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी पोहोचल्याचे वास्तव समोर आले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला हा जिल्हा, आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मानवी बळींमुळे ओळखला जाऊ लागला आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २६ लोकांचा बळी गेला आहे. तर १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत २९ लोकांचा बळी गेला आहे. या दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी ही वाढ दीड पटीने झालेली आहे त्यामुळे वाघासाठी प्रसिद्ध असलेला हा चंद्रपूर जिल्हा आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या बळीमध्ये भारतात अग्रस्थान निर्माण करीत आहे.

वनविभागासमोर मोठे आव्हान

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूची संख्या काहीशी कमी असली, तरी मानवी बळींच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ ही वनविभागासाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. वाढते जंगलालगतचे मानवी वस्ती क्षेत्र, रोजगारासाठी जंगलावर अवलंबून असलेले नागरिक, अपुरे प्रतिबंधात्मक उपाय आणि सतर्कतेचा अभाव या कारणांमुळे संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. गोंडपिपरी व चिमूर तालुक्यात तर वनविभागाविरोधात आंदोलनही करण्यात आले होते.

वनविभागानुसार मानवी मृत्यू

मध्य चांदा वनविभाग : ३ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : ११ब्रह्मपुरी वनविभाग : १९एफडीसीएम : ३चंद्रपूर प्रादेशिक वनविभाग : ११एकूण मृत्यू: ४७

बिबट मृत्यू : ५मध्य चांदा : १ब्रह्मपुरी : ३चंद्रपूर : १

वाघ मृत्यू: १२मध्य चांदा : १चंद्रपूर : १ताडोबा : ५एफडीसीएम : १ब्रह्मपुरी : ४

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Tops Nation in Human-Wildlife Conflict; 47 Fatalities in Year

Web Summary : Chandrapur faces a severe human-wildlife conflict. In 2025, 47 people died due to wild animal attacks, with 12 tiger and 5 leopard deaths recorded. Increased human encroachment and lack of preventive measures intensify the crisis.
टॅग्स :wildlifeवन्यजीवTigerवाघ