शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वरोऱ्याच्या शेतकऱ्याच्या संशोधनावर पेटंटची मोहोर; महाराष्ट्रातील पहिले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 10:22 IST

१२ वर्षांपूर्वी गरमडे यांच्या सोयाबीन शेतात वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्व. दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्षे बियाण्याची वाढ करीत त्याचे जतन व संवर्धन केले.

ठळक मुद्देसोयाबीनच्या एसबीजी-९९७ ला कायदेशीर मान्यता

चंद्रपूर : जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी शाेधून काढलेल्या एसबीजी-९९७ या सोयाबीन वाणाला केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता दिलेली आहे. यानुसार १५ वर्षांसाठी त्यांना उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात आणि निर्यात करण्याचे अधिकार मिळालेले आहेत. सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत.

१२ वर्षांपूर्वी गरमडे यांच्या सोयाबीन शेतात वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्व. दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्षे बियाण्याची वाढ करीत त्याचे जतन व संवर्धन केले. हे वाण प्रतिकूल हवामानातही ‘यलो मोझॅक’ रोगाला बळी पडत नाही. एकरी १७ क्विंटल उत्पादन देते. या वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत असते. एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली होती. एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले होते, असा दावा सुरेश गरमडे यांनी केला आहे.

गरमडे यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथील पेटंट प्राधिकरण कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठविला गेला. त्यानंतर तीन वर्षे सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाचा मागोवा घेतला गेला. तिथेही हे वाण सरस आणि वेगळे आढळून आल्याने हे पेटंट मिळाले आहे.

प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव, आत्मा संचालक मनोहरे, तत्कालीन कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, कृषी अधिकारी जयंत धात्रक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश, आत्मा तालुका समन्वयक घागी, प्रगतिशील शेतकरी विनोद राऊत, श्रीकांत एकुडे यांनी सहकार्य केले.

सोयाबीन संशोधक शेतकरी सुरेश गरमडे यांना एसबीजी-९९७ वाणाकरिता केंद्र सरकारचे पेटंट मिळाले असून ही अभिमानाची गोष्ट आहे. कृषी विभाग त्यांना विविध पातळ्यांवर मदत करीत आहे. महाराष्ट्रात बियाणे विक्रीचा परवाना त्यांना मिळावा, यासाठी सहकार्य असेल.

- भाऊसाहेब वऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी