मध्यवर्ती बॅंकेने दोन महिन्यात वाटले ४५ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:58+5:302021-02-10T04:28:58+5:30
चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मागील दोन महिन्यांमध्ये कर्जवाटपात ४५ कोटींने वाढ केली असून कामकाजामध्ये सुधारणा केली आहे. ...

मध्यवर्ती बॅंकेने दोन महिन्यात वाटले ४५ कोटींचे कर्ज
चंद्रपूर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मागील दोन महिन्यांमध्ये कर्जवाटपात ४५ कोटींने वाढ केली असून कामकाजामध्ये सुधारणा केली आहे. दरम्यान, बॅंकेचे अध्यक्ष संतोष चंदनसिंह रावत यांच्यासह संचालकांनी बॅंकिंग अधिकारी, लिपीक व शिपायांची सभा आयोजित करून बॅंकेची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी संचालक रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार, डाॅ. विजय देवतळे, संजय तोटावार, राजेश रघाताटे, पांडूरंग जाधव, प्रा.ललित मोटघरे, संजय सिंगम, संचालिका प्रभाताई वासाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बॅंक अध्यक्ष तसेच संचालकांनी बॅंकेच्या कामकाज तसेच आलेल्या अडचणी जाणून घेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी बॅंक व्यवसाय वाढीकरिता आपल्या शाखा परिसरातील सामान्य नागरिक, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेऊन कर्जधोरण व बॅंकेच्या योजनांची माहिती देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, कर्जधोरण व बॅंकेच्या योजनांची माहिती दिल्यानंतर आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले.