शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कचरा जाळून प्रदूषणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:17 IST

चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

ठळक मुद्देमनपाचा अफलातून कारभार : स्वच्छता अभियानात प्रदूषण वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. आधीच प्रदूषित असलेले शहर यामुळे आणखी प्रदूषित होत आहे.‘चंद्रपूर शहर स्वच्छ होतेय’ असे ब्रिद सध्या शहरातील चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर झळकत आहे. ते खरेही आहे. सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान गंभीरतेने राबविले जात आहे. घराघरातून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे. नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरातील रस्ते, गल्लीबोळात नियमित झाडू फिरत आहे. या सर्व प्रकारामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र या शहर स्वच्छ अभियानात मनपा प्रशासनाचे प्रदूषणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.आधीच चंद्रपूरचे प्रदूषण राज्यभर कुप्रसिध्द आहे. येथील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणे सुरू झाले आहे. त्यामुळे प्रदूषण कसे कमी करता येईल, यासाठी जिल्हा, मनपा, जि.प. प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु प्रदूषणाबाबत या प्रशासनाला काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. महानगरपालिकेने स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे.यावर नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. एखाद्या ठिकाणी कचरा दिसला, प्लॉस्टिक डम्प करून दिसले की नागरिक त्याचे छायाचित्र स्वच्छता अ‍ॅपवर टाकून तक्रार करतात. या तक्रारीची मनपाकडून तातडीची दखल घेतली जात आहे. तत्काळ तेथे मनपाचे स्वच्छता कर्मचारी पोहचतात. मात्र तेथील कचरा उचलून डम्पींग यार्डवर नेण्याऐवजी तो तेथेच जाळला जात आहे. यामुळे प्रदूषण प्रचंड वाढत आहे. कचरा, प्लॉस्टिक जाळल्यामुळे होणाºया धुराचा नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. यासोबत वातावरणही प्रदूषित होत आहे. उल्लेखनीय बाब अशी की संपूर्ण शहरात सर्वत्र असाच प्रकार सुरू आहे. नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅपवर एखाद्या वॉर्डात कचरा आढळून येत असल्याची तक्रार करताच मनपाचे सफाई कामगार तेथे येऊन कचरा जाळून टाकतात. त्यात प्लॉस्टिकचाही समावेश मोठा असतो.नागरिकांनी जागृत व्हावेचंद्रपूरचे प्रदूषण वाढण्यामागे कोळशाचे जाळणे, शेगड्या पेटविणे, कचरा-प्लॉस्टिक जाळणे या बाबीही तेवढ्याच कारणीभूत आहेत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागृत होऊन कचरा पेटवू नये. मनपाच्या सफाई कामगार तसे करताना दिसत असतील, तर त्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात.पूर्वीपासूनच हीच पद्धतजमिनीवरील घाण हवेत पसरविण्याचा घाणेरडा प्रकार आजचा नाही. पूर्वीपासून असेच घडत आले आहे. पूर्वीही रस्त्याच्या कडेला, एखाद्या भिंतीच्या आडोशाला किंवा चौकाच्या एका बाजुला संग्रहित झालेला कचरा तेथेच जाळला जात होता. अनेकवेळा तर कचराकुंड्यातील कचराही जळताना पाहण्यात आले आहे. याशिवाय डम्पींग यार्डवरही अनेकवेळा कचºयाला आग लावण्यात येत होती. ही बाबच चंद्रपूरला प्रदूषित करण्याला कारणीभूत ठरली आहे.वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यककचरा, प्लॉस्टिक जाळून वायू प्रदूषण करण्याचा हा प्रकार गंभीर आहे. सफाई कामगारांना तसे सांगण्यात येत असेल तर तो प्रकार आणखी गंभीर आहे. मात्र सफाई कामगार आपल्याच मर्जीने शहरातील कचरा जाळत असतील, त्यांना आताच आवर घालणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.