शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कचरा जाळून प्रदूषणाला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:17 IST

चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.

ठळक मुद्देमनपाचा अफलातून कारभार : स्वच्छता अभियानात प्रदूषण वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेकडून सध्या स्वच्छता अभियानात धडाक्यात राबविले जात आहे. स्वच्छता अ‍ॅपला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद आहे. मात्र शहर स्वच्छ करताना रस्त्यावरील, मोकळ्या जागेतील कचरा तिथेच जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. आधीच प्रदूषित असलेले शहर यामुळे आणखी प्रदूषित होत आहे.‘चंद्रपूर शहर स्वच्छ होतेय’ असे ब्रिद सध्या शहरातील चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर झळकत आहे. ते खरेही आहे. सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान गंभीरतेने राबविले जात आहे. घराघरातून सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित केला जात आहे. नागरिकही याला चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरातील रस्ते, गल्लीबोळात नियमित झाडू फिरत आहे. या सर्व प्रकारामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र या शहर स्वच्छ अभियानात मनपा प्रशासनाचे प्रदूषणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.आधीच चंद्रपूरचे प्रदूषण राज्यभर कुप्रसिध्द आहे. येथील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणे सुरू झाले आहे. त्यामुळे प्रदूषण कसे कमी करता येईल, यासाठी जिल्हा, मनपा, जि.प. प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु प्रदूषणाबाबत या प्रशासनाला काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. महानगरपालिकेने स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे.यावर नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. एखाद्या ठिकाणी कचरा दिसला, प्लॉस्टिक डम्प करून दिसले की नागरिक त्याचे छायाचित्र स्वच्छता अ‍ॅपवर टाकून तक्रार करतात. या तक्रारीची मनपाकडून तातडीची दखल घेतली जात आहे. तत्काळ तेथे मनपाचे स्वच्छता कर्मचारी पोहचतात. मात्र तेथील कचरा उचलून डम्पींग यार्डवर नेण्याऐवजी तो तेथेच जाळला जात आहे. यामुळे प्रदूषण प्रचंड वाढत आहे. कचरा, प्लॉस्टिक जाळल्यामुळे होणाºया धुराचा नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. यासोबत वातावरणही प्रदूषित होत आहे. उल्लेखनीय बाब अशी की संपूर्ण शहरात सर्वत्र असाच प्रकार सुरू आहे. नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅपवर एखाद्या वॉर्डात कचरा आढळून येत असल्याची तक्रार करताच मनपाचे सफाई कामगार तेथे येऊन कचरा जाळून टाकतात. त्यात प्लॉस्टिकचाही समावेश मोठा असतो.नागरिकांनी जागृत व्हावेचंद्रपूरचे प्रदूषण वाढण्यामागे कोळशाचे जाळणे, शेगड्या पेटविणे, कचरा-प्लॉस्टिक जाळणे या बाबीही तेवढ्याच कारणीभूत आहेत. त्यामुळे नागरिकांनी याबाबत जागृत होऊन कचरा पेटवू नये. मनपाच्या सफाई कामगार तसे करताना दिसत असतील, तर त्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी कराव्यात.पूर्वीपासूनच हीच पद्धतजमिनीवरील घाण हवेत पसरविण्याचा घाणेरडा प्रकार आजचा नाही. पूर्वीपासून असेच घडत आले आहे. पूर्वीही रस्त्याच्या कडेला, एखाद्या भिंतीच्या आडोशाला किंवा चौकाच्या एका बाजुला संग्रहित झालेला कचरा तेथेच जाळला जात होता. अनेकवेळा तर कचराकुंड्यातील कचराही जळताना पाहण्यात आले आहे. याशिवाय डम्पींग यार्डवरही अनेकवेळा कचºयाला आग लावण्यात येत होती. ही बाबच चंद्रपूरला प्रदूषित करण्याला कारणीभूत ठरली आहे.वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यककचरा, प्लॉस्टिक जाळून वायू प्रदूषण करण्याचा हा प्रकार गंभीर आहे. सफाई कामगारांना तसे सांगण्यात येत असेल तर तो प्रकार आणखी गंभीर आहे. मात्र सफाई कामगार आपल्याच मर्जीने शहरातील कचरा जाळत असतील, त्यांना आताच आवर घालणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.