धुरांच्या लोंढ्यामुळे सास्तीवासीयांचा श्वास कोंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:35+5:30

शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे.

The breathing was stopped by the smoke | धुरांच्या लोंढ्यामुळे सास्तीवासीयांचा श्वास कोंडला

धुरांच्या लोंढ्यामुळे सास्तीवासीयांचा श्वास कोंडला

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। गाव कोळसा खाणींनी वेढले, वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या व डोळ्यांच्या रूग्णात वाढ

नितीन मुसळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : वेकोलिच्या विविध कोळसा खाणींने वेढलेल्या सास्ती गावातील जनता मागील अनेक वर्षापासून धुरांच्या लोंढ्यात जगत असून या धुरातून निघणाऱ्या विविध विषारी वायूमुळे अनेकांना दम्याच्या व डोळ्यांच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांच्याही प्रकृतीवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी अशा विविध भूमिगत व खुल्या खाणी सास्ती गावाच्या परिसरात असून काही खाणी तर अगदीच गावाला लागून आहेत. या कोळसा खाणीतील कोळसा वाहतूकसुद्धा सास्ती गावाजवळून होत असल्याने कोळशाची धूळ, जळालेल्या कोळशाचा धूर, कोळशातून निघणारा विविध विषारी वायू नागरिकांना आजाराच्या खाईत लोटत आहे.

कोळशाच्या शेगडीचाही धूर
शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुरामुळे अनेकांना ह्दयाच्या व दम्याच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. तर बालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोळशाच्या ज्वलनानंतर विविध विषारी वायू बाहेर पडत असतात. ते विषारी वायू अत्यंत हानीकारक असून आरोग्यास धोकादायक आहे. ही गंभीर बाब आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळीच या धुरावर व धुळीवर आळा न घातल्यास भविष्यात सास्तीवासीय जनतेला हदयाच्या रोगापासून कुणीही वाचवू शकणार नाही, हे मात्र खरे.

सास्ती गावात मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग वास्तव्यास आहे. गरिबीमुळे स्वयंपाकासाठी त्यांना कोळशाच्या शेगडीचा वापर करावा लागत आहे. उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत अनेकांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाले असले तरी अनेक गरीब जनता यापासून वंचित आहे. त्यांना गॅस कनेक्शन उपलब्ध झाल्यास यावर आळा बसू शकते.
- रमेश पेटकर, सरपंच सास्ती

कोळसा खाण परिसरात पसरलेली धूळ, सोबतच जळालेल्या कोळशातून निघणारा धूर आरोग्यास अत्यंत धोकादायक असून यामुळे परिसरातील जनतेला हदयाच्या रोगासोबतच दमासारख्या रोगाला बळी पडावे लागत आहे. तर धुळीमुळे डोळ्यांच्या आजाराच्या रूग्णातही वाढ होत आहे.
- डॉ. ए. डी. जाधव,
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली (बू.)

Web Title: The breathing was stopped by the smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.