शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रक्ताचे नातेही गोठले, स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:27 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दररोज २५ ते ३० बाधितांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. या मृतकांवर चंद्रपूर पठाणपुरा गेटबाहेरील स्मशानभूमीत करण्यात येत ...

चंद्रपूर जिल्ह्यात दररोज २५ ते ३० बाधितांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. या मृतकांवर चंद्रपूर पठाणपुरा गेटबाहेरील स्मशानभूमीत करण्यात येत आहे. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर मनपाचे त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात येते. परंतु, काही नातेवाईक तुम्हीच अंतिम संस्कार उरकून घेण्याचा सल्ला देत असल्याचेही सामोर आले आहे तर काही नातेवाईक अंतिम संस्कारासाठी येतात. मनपा कर्मचारी मृतदेह स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात. यावेळी नातेवाइक उपस्थित असले तर त्यांच्यातर्फे अग्नी देण्यात येतो. संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत नातेवाईकांना अस्थी देण्यात येतो. परंतु, बरेच नातेवाईक अस्थी नेण्यासाठी येतच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दररोज गोळा झालेल्या राखेचे करायचे काय, असा प्रश्न स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बॉक्स

अस्थींचे करायचे काय

चंद्रपूर येथील पठाणपुरा गेटबाहेरील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येते. दररोज १५ ते २० मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात येतो. काही नातेवाईक दुसऱ्या दिवशी अस्थी घेऊन जात असतात तर बहुतेकांचे नातेवाहिक अस्थी नेण्यासाठी येतच नाही. त्यामुळे एवढ्यासारख्या अस्थींचे करायचे काय, असा प्रश्न स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बॉक्स

राखेची विल्हेवाट तुम्हीच लावा

कोट

अंतिम संस्कार झाल्यानंतर नातेवाईकांना सकाळी सात वाजताच्या आत येऊन अस्थी नेण्याबाबत सांगतो. काही नातेवाईक नेण्यासाठी येतात तर बहुतेकजण येतच नसल्याचे अनेकदा बघायला मिळाले आहे.

- कर्मचारी

--------

बहुतेक मृताचे नातेवाईक अंतिम संस्कारासाठी येतच नाही. त्याची पूर्ण विधी आम्हीच पार पाडत असतो. त्यामुळे त्या अस्थी नेण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे ती अस्थी सध्यातरी येथेच ठेवण्यात आली आहे.

-कर्मचारी

-----

अस्थिविसर्जन झाल्यानंतर नातेवाईकांना अस्थिंसंदर्भात विचारताच तुम्हीच अस्थीची विल्हेवाट लावा, असा सल्ला आम्हाला दिला जातो. दुसऱ्या दिवशी साधी अस्थीचे काय केले, हे विचारणा करण्यासाठीसुद्धा नातेवाईक येत नाही.

-कर्मचारी