प्रदूषणाविरोधात कामगार कुटुंबीयांचे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:59+5:302021-03-14T04:25:59+5:30
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस न्यू रेल्वे सायडिंग दरम्यान कोळसा वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने तथा रेल्वे वॅगनमध्ये ...

प्रदूषणाविरोधात कामगार कुटुंबीयांचे रास्ता रोको
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या घुग्घुस न्यू रेल्वे सायडिंग दरम्यान कोळसा वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने तथा रेल्वे वॅगनमध्ये कोळसा टाकताना उडणाऱ्या धुळीमुळे त्या परिसरात राहणाऱ्या कामगार व अन्य नागरिकांच्या आरोग्यावर दूष्परिणाम होत आहे. प्रदूषण थांबविण्याच्या मागणीसाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान गांधीनगर, शालिकराम नगर, सुभाषनगर, शांतिनगर येथील संतप्त महिला,पुरुषांनी रेल्वे सायडिंग रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करून कोळसा वाहतूक रोखली.
वेकोलिच्या वणी क्षेत्रातील नायगाव,निलजई, पैनगंगा,मुंगोली, कोलगाव कोळसा खाणीतील कोळसा येथील रेल्वे सायडिंगवर रात्र-दिवस हायवा ट्रकने नेला जातो. रस्त्यावर पाण्याचा छिडकाव किंवा धुळीचे प्रदूषण होऊ नये यासाठी कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनापासून प्रदूषण होत असते, त्याच बरोबरच सायडिंगवर ट्रकमधून कोळसा खाली करणे व पे -लोडरच्या साहाय्याने रेल्वे वॅगनमध्ये लोडिंग करणे, यामुळे रात्रंदिवस प्रदूषण होत असते. त्या परिसरातील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्रास होत असून आरोग्य धोक्यात आले आहे.
बॉक्स
यापूर्वीही केले आंदोलन
यापूर्वीही अनेकदा आंदोलने करून रस्त्यावर पाण्याचा छिडकाव करावा, या मागणी ठी रेल्वेसायडिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर इंदिरानगरच्या तर , रेल्वे सायडिंगला कडेला लागून असलेल्या कामगार वसाहत परिसरातील वास्तव्यास असलेल्या कामगार व अन्य नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. मात्र काही दिवस रस्त्यावर टॅंकरने पाणी टाकून नंतर वेकोलिच्या अधिकाऱ्यांना विसर पडला. त्यामुळे शनिवारी दुपारी भर उन्हात पुन्हा नागरिकांनी रास्तारोको करून मागणीकडे लक्ष वेधले.