शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

चिचाळा येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी बिनकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:24 IST

येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर सुरू असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकऱ्यांनी केली आहे.चिचाळा शास्त्री येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून हरिदास सुखदेवे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. बांधकामासाठी रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी काढली नाही, असा आरोप उपसरपंच राऊत यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत बंधाºयाचे काम करणाऱ्याला कंत्राटदाराला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असा दम दिला जात असल्याचेही गावकºयांनी तक्रारीत म्हटले आहे.बांधकाम करताना सदर कामाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायतीला कळविले नाही. बांधकाम सुरू असलेल्या जागेवर संबंधित माहितीचा फलक लावला नाही. बंधाºयाचे बांधकाम सुरू असताना जि. प. शाखा अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली नाही, असा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.बांधकामाची चौकशी करावीशासनाने 'पाणी अडवा- पाणी जिरवा' या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु कंत्राटदार व अभियंताच्या संगनमताने बांधकाम निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. परिणामी, शासनाचा लाखोंचा निधी वाया जात आहे. चिचाळा शास्त्री या गावातही हाच प्रकार घडत असल्याने चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत, ग्रा. पं. सदस्य हरिदास सुखदेवे, जीवन रंदई, रंजू दडमल आदींनी संबंधित अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.अन्यथा पीक वाया जाणारचिमूर तालुक्यात सिंचनाचे प्रमाण आधीच कमी आहे. अनेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक पीक घेतात. शासनाने विविध योजनांद्वारे सिंचन योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, काही अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे असे प्रकल्प बिनकामी ठरण्याचा धोका निर्माण झाला. अशा घटनांमुळे यंदाही पिकांचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई