शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

चिचाळा येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी बिनकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:24 IST

येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर सुरू असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकऱ्यांनी केली आहे.चिचाळा शास्त्री येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून हरिदास सुखदेवे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. बांधकामासाठी रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी काढली नाही, असा आरोप उपसरपंच राऊत यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत बंधाºयाचे काम करणाऱ्याला कंत्राटदाराला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असा दम दिला जात असल्याचेही गावकºयांनी तक्रारीत म्हटले आहे.बांधकाम करताना सदर कामाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायतीला कळविले नाही. बांधकाम सुरू असलेल्या जागेवर संबंधित माहितीचा फलक लावला नाही. बंधाºयाचे बांधकाम सुरू असताना जि. प. शाखा अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली नाही, असा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.बांधकामाची चौकशी करावीशासनाने 'पाणी अडवा- पाणी जिरवा' या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु कंत्राटदार व अभियंताच्या संगनमताने बांधकाम निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. परिणामी, शासनाचा लाखोंचा निधी वाया जात आहे. चिचाळा शास्त्री या गावातही हाच प्रकार घडत असल्याने चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत, ग्रा. पं. सदस्य हरिदास सुखदेवे, जीवन रंदई, रंजू दडमल आदींनी संबंधित अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.अन्यथा पीक वाया जाणारचिमूर तालुक्यात सिंचनाचे प्रमाण आधीच कमी आहे. अनेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक पीक घेतात. शासनाने विविध योजनांद्वारे सिंचन योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, काही अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे असे प्रकल्प बिनकामी ठरण्याचा धोका निर्माण झाला. अशा घटनांमुळे यंदाही पिकांचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई