शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

चिचाळा येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी बिनकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:24 IST

येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर सुरू असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकऱ्यांनी केली आहे.चिचाळा शास्त्री येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून हरिदास सुखदेवे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. बांधकामासाठी रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी काढली नाही, असा आरोप उपसरपंच राऊत यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत बंधाºयाचे काम करणाऱ्याला कंत्राटदाराला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असा दम दिला जात असल्याचेही गावकºयांनी तक्रारीत म्हटले आहे.बांधकाम करताना सदर कामाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायतीला कळविले नाही. बांधकाम सुरू असलेल्या जागेवर संबंधित माहितीचा फलक लावला नाही. बंधाºयाचे बांधकाम सुरू असताना जि. प. शाखा अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली नाही, असा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.बांधकामाची चौकशी करावीशासनाने 'पाणी अडवा- पाणी जिरवा' या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु कंत्राटदार व अभियंताच्या संगनमताने बांधकाम निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. परिणामी, शासनाचा लाखोंचा निधी वाया जात आहे. चिचाळा शास्त्री या गावातही हाच प्रकार घडत असल्याने चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत, ग्रा. पं. सदस्य हरिदास सुखदेवे, जीवन रंदई, रंजू दडमल आदींनी संबंधित अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.अन्यथा पीक वाया जाणारचिमूर तालुक्यात सिंचनाचे प्रमाण आधीच कमी आहे. अनेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक पीक घेतात. शासनाने विविध योजनांद्वारे सिंचन योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, काही अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे असे प्रकल्प बिनकामी ठरण्याचा धोका निर्माण झाला. अशा घटनांमुळे यंदाही पिकांचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई