शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

चिचाळा येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी बिनकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:24 IST

येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर सुरू असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकऱ्यांनी केली आहे.चिचाळा शास्त्री येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून हरिदास सुखदेवे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्यावर बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या जात आहे. बांधकामासाठी रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी काढली नाही, असा आरोप उपसरपंच राऊत यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत बंधाºयाचे काम करणाऱ्याला कंत्राटदाराला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जात नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, असा दम दिला जात असल्याचेही गावकºयांनी तक्रारीत म्हटले आहे.बांधकाम करताना सदर कामाची माहिती ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायतीला कळविले नाही. बांधकाम सुरू असलेल्या जागेवर संबंधित माहितीचा फलक लावला नाही. बंधाºयाचे बांधकाम सुरू असताना जि. प. शाखा अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली नाही, असा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.बांधकामाची चौकशी करावीशासनाने 'पाणी अडवा- पाणी जिरवा' या योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. परंतु कंत्राटदार व अभियंताच्या संगनमताने बांधकाम निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. परिणामी, शासनाचा लाखोंचा निधी वाया जात आहे. चिचाळा शास्त्री या गावातही हाच प्रकार घडत असल्याने चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत, ग्रा. पं. सदस्य हरिदास सुखदेवे, जीवन रंदई, रंजू दडमल आदींनी संबंधित अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.अन्यथा पीक वाया जाणारचिमूर तालुक्यात सिंचनाचे प्रमाण आधीच कमी आहे. अनेक शेतकरी पाण्याअभावी पारंपरिक पीक घेतात. शासनाने विविध योजनांद्वारे सिंचन योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, काही अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे असे प्रकल्प बिनकामी ठरण्याचा धोका निर्माण झाला. अशा घटनांमुळे यंदाही पिकांचे नुकसान होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई