शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांसह गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा हादरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST

चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी करण्यामागे राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाची भूमिका होती. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे ...

चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी करण्यामागे राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाची भूमिका होती. दारूमुळे उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचविण्यासाठी जिल्ह्यात दारुबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय भाजप सरकारने घेतला. गेल्या सहा वर्षात दारुबंदीचे काय फायदे आणि ताेटे झाले. याचा हिशेब मांडला तर फायदा निश्चितच झालेला आहे. परंतु या सोबतच जिल्ह्यात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले. नेहमी शांत असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूसह, वाळू तस्करी, सोबतच अन्य गुन्हेगारांनाही मोठे बळ मिळाले. संघटित गुन्हेगारी वाढीस लागली. घराघरातील वादांवर दारुबंदीने आळा बसला असला तरी जिल्ह्याच्या मुख्यालयापासून तर गावाच्या गल्लीबोळात दारूमाफियांची फौजच तयार झाली. पोलिसांनाही यामुळे सुगीचे दिवस आले. दारूंविक्रेत्याला शासन होण्याऐवजी पोलीस त्यांना अभयच देताना दिसून आले. हीच बाब जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याला खतपाणी मिळाले. दारूविक्रेता मोठ्या दिमाखाने वावरताना दिसत होता. आपले कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही, हा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. दारुबंदी झाल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात दारू मिळणार नाही. सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असे जनतेला वाटत असताना मात्र काही दिवसातच उलट चित्र बघायला मि‌ळाले. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दारूतस्करीला ऊत आला. परवाना प्राप्त दुकानातून मिळणारी दारू गल्लीबोळात मिळू लागली. अवैध दारू विक्रीच्या व्यवसायाला असंख्य बेरोजगारांनी रोजगाराचे स्वरूप दिले. राज्य शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी फेरले गेले. अवैध दारू विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर अनेकजण कोट्याधीश झाली. त्यांचे राहणीमान बदलून गेले. कालांतराने ही दारूबंदी आता उठणे शक्य नाही, असा गैरसमज करून काही राजकीय नेतेमंडळींनी दारूविक्रेत्यांना हाताशी धरून या व्यवसायाला बळ देण्याचेच काम केले. दारुबंदीचा निर्णय उठला याचा आनंद नसला तरी यामुळे जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आता होणार नाही. दारूतस्कारी होणार नाही. इमाने-इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे नाहक बळी जाणार नाही. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल. अवैध दारूविक्रीतून सुरू झालेली वर्चस्वाची लढाई आता होणार नाही, याबाबी आनंद देणाऱ्या असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यात आता उमटू लागल्या आहे.

लपूनछपून येणाऱ्या दारूला मिळाली तस्करांची साथ

दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतर काहीजण लपून दारू आणून विकत हाेते. कालांतराने प्रत्येक गावात, शहराच्या वाॅर्डात दारूविक्रेते उदयास आले. ही मंडळी दुप्पट, तिप्पट दराने दारू विक्री करीत असल्याचे पाहून अल्पावधीत मोठ्या झालेल्या दारूतस्करांनी व्हाईट काॅलर लोकांची मर्जी जोपासणे सुरू केले. इतकेच नव्हे, तर जिल्ह्यात दारूतस्करांची साखळीच तयार झाली. राजकीय वरदहस्त आणि खाकीची साथ असे नवे स्वरुप या अवैध दारू व्यवसायाला प्राप्त झाले. प्रत्येकांचे क्षेत्र वाटल्या गेले. दारू कुठून येणार, कुठे जाणार, कोण विकणार येथपासून तर ती दारू नियोजितस्थळी सुखरूप पोहचण्यासाठी काही पायलट वाहनेही सोबत असायची. यामध्ये पोलिसांचीही वाहने सुरक्षा देण्यासाठी असायची. डाव साधला नाही तर थातूरमातूर कारवाई करायची, अशा पद्धतीने या व्यवसायाने आपले पाय जिल्ह्यात घट्ट रोवले होते. शासनाच्या निर्णयाचा पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांसह काही राजकीय नेतेमंडळी व दारूमाफियांना मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे.