शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
2
फक्त ५० मिनिटे उरली! आझाद मैदान रिकामे करा; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलीस एक्शन मोडमध्ये
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: २४ तासांची परवानगी, मग आता तुम्ही कोणत्या अधिकारात तिथे बसला आहात; हायकोर्टाचा सवाल
4
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
5
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
6
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
7
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
8
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
9
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
10
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
11
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
12
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
13
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
14
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
15
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
16
Mumbai: डहाणूच्या चंद्रसागर खाडीत अवतरले पक्षीवैभव
17
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
18
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
19
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
20
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

‘बाप्पा मोरया’च्या गजरात श्रींना निरोप

By admin | Updated: September 9, 2014 00:15 IST

रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे

अलोट गर्दी : पावसाळी वातावरणावर उत्साहाची मातचंद्रपूर: रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे काय होईल, अशी भीती प्रत्येक मंडळाला होती. अशातच पावसाची रिपरिप कमी झाली आणि ढोलताशाचा गजर आणि डीजेचा ताल, संदल, बँडचे ठोके वाजू लागले. या धुंद वातावरणात गणेशभक्तांची पावलं थिरकू लागली. यंदा तप्त सुर्यकिरण नसल्याने वातावरणात गारवा होता. या गारव्यातच गणरायाला चंद्रपूरकरांनी निरोप दिला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळलेली होती. विविध गणेशमंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एरवी विसर्जनाच्या दिवशी सकाळी १० वाजतापासूनच शहरातील अंतर्गत वार्डातील सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीला प्रारंभ करतात. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आज सकाळपासून कायमच होता. पाऊस उसंत घेईल, या प्रतीक्षेत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी काही वेळ प्रतीक्षा करणे पसंत केले. मात्र रिमझिम पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत कायमच होता. अखेर काही मंडळांनी प्लॅस्टिक, ताडपत्री झाकून मिरवणूक काढली. दुपारी १२ वाजतानंतर काही विसर्जन मिरवणुका कस्तुरबा मार्गावर आल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरिप बंद झाली आणि ढोलताशे, डिजेची धूम सुरू झाली. दुपारी २.३० वाजेपर्यंत रामनगर, नगिना बाग मार्ग, भानापेठ, पठाणपुरा मार्ग, अंचलेश्वर गेटच्या आतील मार्गावर विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. त्यामुळे दुपारी १ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्ग जटपुरा गेट, कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग या मार्गांवर सार्वजनिक गणेश मंडळांची रिघ लागली होती. विठ्ठल मंदिर वॉर्ड, पठाणपुरा, समाधी वॉर्ड परिसरातील गणेश मंडळे गांधी चौकात पोहोचली. यावेळी लोकमान्य टिळक शाळा ते जटपुरा गेट या मार्गावर असलेल्या गणेश मंडळांचे मंदगतीने मार्गक्रमण सुरू होते. यावेळी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्याऐवजी पोलिसांनी दर काही मीटर अंतरावर पोलीस तैनात ठेवले होते. त्यांच्यासोबत एक वाहतूक पोलीसही असल्यामुळे कुठेही वाहतूक ठप्प होताना दिसली नाही. चक्क़ दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मिरवणुका सुरू असूनही कस्तुरबा मार्गावरून चारचाकी वाहने जाताना दिसली. यात खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांचेही वाहन होते.जटपुरा गेटवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व गणेश मंडळांवर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गणेश मंडळाचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, गजानन गावंडे तर लोकमान्य टिळक शाळेजवळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, किशोर जोरगेवार व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. दाताळा मार्गावरील इरई नदी व रामाळा तलावात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन झाले. यावेळी महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर मिरवणुका सुरूच होत्या. (शहर प्रतिनिधी)