शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘बाप्पा मोरया’च्या गजरात श्रींना निरोप

By admin | Updated: September 9, 2014 00:15 IST

रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे

अलोट गर्दी : पावसाळी वातावरणावर उत्साहाची मातचंद्रपूर: रविवारी रात्रीपासून बरसणारा पाऊस सोमवारी सकाळीही कायम होता. अशा रिमझिम पावसातच गणरायाला निरोप देणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. विसर्जन मिरवणुकीचे काय होईल, अशी भीती प्रत्येक मंडळाला होती. अशातच पावसाची रिपरिप कमी झाली आणि ढोलताशाचा गजर आणि डीजेचा ताल, संदल, बँडचे ठोके वाजू लागले. या धुंद वातावरणात गणेशभक्तांची पावलं थिरकू लागली. यंदा तप्त सुर्यकिरण नसल्याने वातावरणात गारवा होता. या गारव्यातच गणरायाला चंद्रपूरकरांनी निरोप दिला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळलेली होती. विविध गणेशमंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एरवी विसर्जनाच्या दिवशी सकाळी १० वाजतापासूनच शहरातील अंतर्गत वार्डातील सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीला प्रारंभ करतात. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आज सकाळपासून कायमच होता. पाऊस उसंत घेईल, या प्रतीक्षेत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी काही वेळ प्रतीक्षा करणे पसंत केले. मात्र रिमझिम पाऊस दुपारी १२ वाजेपर्यंत कायमच होता. अखेर काही मंडळांनी प्लॅस्टिक, ताडपत्री झाकून मिरवणूक काढली. दुपारी १२ वाजतानंतर काही विसर्जन मिरवणुका कस्तुरबा मार्गावर आल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पावसाची रिपरिप बंद झाली आणि ढोलताशे, डिजेची धूम सुरू झाली. दुपारी २.३० वाजेपर्यंत रामनगर, नगिना बाग मार्ग, भानापेठ, पठाणपुरा मार्ग, अंचलेश्वर गेटच्या आतील मार्गावर विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. त्यामुळे दुपारी १ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्ग जटपुरा गेट, कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग या मार्गांवर सार्वजनिक गणेश मंडळांची रिघ लागली होती. विठ्ठल मंदिर वॉर्ड, पठाणपुरा, समाधी वॉर्ड परिसरातील गणेश मंडळे गांधी चौकात पोहोचली. यावेळी लोकमान्य टिळक शाळा ते जटपुरा गेट या मार्गावर असलेल्या गणेश मंडळांचे मंदगतीने मार्गक्रमण सुरू होते. यावेळी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्याऐवजी पोलिसांनी दर काही मीटर अंतरावर पोलीस तैनात ठेवले होते. त्यांच्यासोबत एक वाहतूक पोलीसही असल्यामुळे कुठेही वाहतूक ठप्प होताना दिसली नाही. चक्क़ दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मिरवणुका सुरू असूनही कस्तुरबा मार्गावरून चारचाकी वाहने जाताना दिसली. यात खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांचेही वाहन होते.जटपुरा गेटवर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व गणेश मंडळांवर पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गणेश मंडळाचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, गजानन गावंडे तर लोकमान्य टिळक शाळेजवळ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार, आ. नाना शामकुळे, किशोर जोरगेवार व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. दाताळा मार्गावरील इरई नदी व रामाळा तलावात गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पहिल्या सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन झाले. यावेळी महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर मिरवणुका सुरूच होत्या. (शहर प्रतिनिधी)