शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बनणे ठरत आहे दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:56 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४५० शिक्षक अतिरिक्त : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेतलोकमत दिन विशेष

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने जिल्ह्यातील ४५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक भरती बंद केली. दरम्यान मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. परिणामी अनेक डीटीएड व बीएड धारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यामुळे शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना शासनाने टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. परिणामी अनेक बेरोजगार शिक्षेकांची फौज निर्माण झाली. त्यातच अनेक शाळामधील शिक्षकांचे पद अतिरिक्त ठरत असल्यामुळे शिक्षकभरतीसुद्धा काही वर्षात होणार नसल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे अनेकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले. अशी प्रतीक्रिया अनेक शिक्षक पदविका संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी लोकमतजवळ दिली.हलाकीची परिस्थिती असतानाही अनेकांनी शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्याबाहेर तसेच विदर्भाबाहेर जावून शिक्षक पदविका संपादन केली. त्यावेळी अनेकांना त्रास सहन करावा लागला. तरीही विद्यार्थ्यांनी पदवी संपादित केली.श्मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज समिकरण बदलत चालले आहे. आहे त्या शिक्षकांनाच नोकरी टिकविणे कठीण जात आहे. त्यामुळे पदविका प्राप्त उमेदवारांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंग झाल्याचे चिन्ह दिसत आहेत.टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी सीईटीच्या प्रतीक्षेतशिक्षण पदविका घेतल्यानंतर सीईटी परीक्षा देण्यापूर्वी टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर सीईटी परीक्षेस पात्र ठरविण्यात येणार होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यी सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.खासगी शाळेत लाखो रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधार ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे. स