शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बनणे ठरत आहे दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:56 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४५० शिक्षक अतिरिक्त : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेतलोकमत दिन विशेष

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने जिल्ह्यातील ४५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक भरती बंद केली. दरम्यान मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. परिणामी अनेक डीटीएड व बीएड धारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यामुळे शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना शासनाने टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. परिणामी अनेक बेरोजगार शिक्षेकांची फौज निर्माण झाली. त्यातच अनेक शाळामधील शिक्षकांचे पद अतिरिक्त ठरत असल्यामुळे शिक्षकभरतीसुद्धा काही वर्षात होणार नसल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे अनेकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले. अशी प्रतीक्रिया अनेक शिक्षक पदविका संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी लोकमतजवळ दिली.हलाकीची परिस्थिती असतानाही अनेकांनी शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्याबाहेर तसेच विदर्भाबाहेर जावून शिक्षक पदविका संपादन केली. त्यावेळी अनेकांना त्रास सहन करावा लागला. तरीही विद्यार्थ्यांनी पदवी संपादित केली.श्मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज समिकरण बदलत चालले आहे. आहे त्या शिक्षकांनाच नोकरी टिकविणे कठीण जात आहे. त्यामुळे पदविका प्राप्त उमेदवारांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंग झाल्याचे चिन्ह दिसत आहेत.टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी सीईटीच्या प्रतीक्षेतशिक्षण पदविका घेतल्यानंतर सीईटी परीक्षा देण्यापूर्वी टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर सीईटी परीक्षेस पात्र ठरविण्यात येणार होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यी सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.खासगी शाळेत लाखो रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधार ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे. स