शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बनणे ठरत आहे दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:56 IST

अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४५० शिक्षक अतिरिक्त : पदवीधारक सीईटीच्या प्रतीक्षेतलोकमत दिन विशेष

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांनी बालपणापासून शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून डीटीएड व बीएड पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न उद्भवत असल्याने जिल्ह्यातील ४५० शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. त्यामुळे शासनाने शिक्षक भरती बंद केली. दरम्यान मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा झाली नाही. परिणामी अनेक डीटीएड व बीएड धारकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न दुरापास्त झाले आहे.पूर्वी झटपट नोकरी मिळण्याचे शिक्षण म्हणून डीटीएडकडे बघितल्या जात होते. डीटीएडची पदवी धारण करुन बाहेर पडल्याबरोबरच शिक्षकाची नोकरी मिळायची. मात्र त्यानंतर शासनाने अनेक खासगी महाविद्यालयाला परवानगी दिली. त्यामुळे दरवर्षी शिक्षक पदविका घेणारे लाखों विद्यार्थी बाहेर पडू लागले. त्यामुळे शिक्षक पदविका धारण केलेल्या विद्यार्थ्यांची फौज तयार झाली.त्यामुळे शिक्षकांसाठी आवश्यक पात्रता असताना शासनाने टीईटी परीक्षा सुरु केली. टीईटी परीक्षा उत्तीर्णच विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी पात्र ठारणार होता. मात्र अनेक डीटीएड व बीएड पदविधारकांनी टीईटी परीक्षा परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झालीच नाही. परिणामी अनेक बेरोजगार शिक्षेकांची फौज निर्माण झाली. त्यातच अनेक शाळामधील शिक्षकांचे पद अतिरिक्त ठरत असल्यामुळे शिक्षकभरतीसुद्धा काही वर्षात होणार नसल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे अनेकांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले. अशी प्रतीक्रिया अनेक शिक्षक पदविका संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी लोकमतजवळ दिली.हलाकीची परिस्थिती असतानाही अनेकांनी शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिल्ह्याबाहेर तसेच विदर्भाबाहेर जावून शिक्षक पदविका संपादन केली. त्यावेळी अनेकांना त्रास सहन करावा लागला. तरीही विद्यार्थ्यांनी पदवी संपादित केली.श्मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज समिकरण बदलत चालले आहे. आहे त्या शिक्षकांनाच नोकरी टिकविणे कठीण जात आहे. त्यामुळे पदविका प्राप्त उमेदवारांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंग झाल्याचे चिन्ह दिसत आहेत.टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी सीईटीच्या प्रतीक्षेतशिक्षण पदविका घेतल्यानंतर सीईटी परीक्षा देण्यापूर्वी टीईटी परीक्षा पास होणे अनिवार्य करण्यात आले. त्यानंतर सीईटी परीक्षेस पात्र ठरविण्यात येणार होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, मागील सात वर्षांपासून सीईटी परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यी सीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.खासगी शाळेत लाखो रुपयांची मागणीशासनाच्या नव्या धोरणानुसार खासगी शाळेतील शिक्षकांची भरती परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. मात्र याची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याने खाजगी शाळेत शिक्षणसेवक तसेच साहाय्य शिक्षक भरतीसाठी संस्थाचालकांकडून लाखो रुपयांचे डोनेशनची मागणी केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य पदविधार ही रकम भरण्यास असमर्थ आहे. परिणामी शैक्षणिक पात्राता असूनही विद्यार्थ्यांचे शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे. स