सावधान, आता निष्काळजीपणा नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:13+5:302021-03-15T04:26:13+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहे. शेजारील जिल्ह्यात लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. तर ...

सावधान, आता निष्काळजीपणा नकोच
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूने तोंड वर काढले आहे. शेजारील जिल्ह्यात लाॅकडाऊन होण्याची स्थिती आहे. तर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ही धोक्याची सूचना आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्याचा परिणामही चंद्रपूर जिल्ह्यावर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सावधान होण्याची गरज असून आता निष्काळजीपणा परवडणारा नाही.
कोरोनाने आपला पुन्हा उद्रेक सुरू केला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याला नागरिकांची बेफिकिरी जबाबदार आहे. यामुळे केंद्रीय समितीने विदर्भाला पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा उद्रेक बघता नागपूरमध्ये लाॅकडाऊन केला जाणार आहे. तर जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही स्थिती गंभीर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता सतर्क होणे गरजेचे आहे. नागरिकांनी गाफील न राहता उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
लाॅकडाऊन टाळण्यासाठी हे करा
शेजारील जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. नागपूर, यवतमाळ तसेच अमरावतीमध्येही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या आढळत आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उपाययोजनांकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर नागपूरसारखेच चंद्रपूरला लाॅकडाऊन होऊ शकते. मात्र आता लाॅकडाऊन परवडणारे नसून लाॅकडाऊन टाळायचे असल्यास प्रत्येकाने नियमांचे पालक करणे हाच एकमेव उपाय आहे. यामुळेच आता जिल्हावासीयांनी कोराना विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असून, प्रत्येकाने माॅस्क, सॅनिटायझर लावणे अत्यावश्यक आहे.