बँकांनी कर्ज ठेवीचे प्रमाण वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:31+5:30
लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा तात्काळ लाभ मिळावा व आधार प्रमाणिकरण करून बँक आणि प्रशासनाने समन्वय साधून हे काम पूर्ण करावे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रामध्ये जावून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

बँकांनी कर्ज ठेवीचे प्रमाण वाढवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील बँकांनी ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच कर्ज ठेवी प्रमाण( क्रेडिट डिपॉझिट रेशीओ) वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व बँकांच्या अधिकारी व प्रतिनिधींना दिल्या. बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक शंभुनाथ झा, डीडीएम नाबार्ड आजिनाथ टिले, एलडीओ आरबीआय उमेश भंसाली, ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीधर नालार्वार, बँक आॅफ महाराष्ट्राचे आंचलिक प्रबंधक प्रफुल पालीवार, सीडीसीसीचे सीईओ सिद्धार्थ दुबे, महामंडळांचे प्रतिनिधी व सर्व बँकांचे अधिकारी, समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित होते.
लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा तात्काळ लाभ मिळावा व आधार प्रमाणिकरण करून बँक आणि प्रशासनाने समन्वय साधून हे काम पूर्ण करावे. यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रामध्ये जावून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ या महामंडळांच्या अडचणी व आढावा जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत घेतला.