शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्याच्या आंदोलनात बंजारा महिला सरसावल्या

By admin | Updated: August 11, 2016 00:40 IST

वेगळा विदर्भ राज्याची मागणी आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण देशात या मागणीची व आंदोलनाची चर्चा होत आहे.

वेशभूषा आंदोलनाचे आकर्षण : आंदोलनस्थळी महिलांच्या पारंपारिक वेशभुषांचीच चर्चासंघरक्षित तावाडे जिवतीवेगळा विदर्भ राज्याची मागणी आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण देशात या मागणीची व आंदोलनाची चर्चा होत आहे. यासाठी वैदर्भियांनी आंदोलने सुरु केली. यात वैदर्भीय जनता मागे नाही. मंगळवारी नागपूर येथे झालेल्या आंदोलनात पुरुषांसह महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यात जिवती तालुक्यातील बंजारा समाजातील महिलांचाही समावेश होता. त्यांनी परिधान केलेली पारंपारिक वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.विदर्भातील शेवटचे टोक तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील बंजारा समाजाच्या महिला स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी अत्यंत आग्रही असल्याचे यावेळी दिसून आले. आपली पारंपारिक वेशभूषा परिधान करुन त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विदर्भ राज्य प्रत्येकाला हवे आहे, विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे, हे या माताभगीनींनी दाखवून दिले आहे. बंजारा समाजातील महिलांसोबतच जिवती तालुक्यातील अनेक महिलाही या आंदोलनात आवर्जुन सहभागी झाल्या. यावरून त्यांच्यातील वेगळ्या विदर्भाची कनव दिसून येत आहे.९ आॅगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूर येथे हे आंदोलन ठेवण्यात आले होते.मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ना. नितीन गडकरी यांनी वेगळा विदर्भ राज्य अशी भाषा वापरली होती. आणि त्याचीच आठवण करुन देण्यासाठी ना. गडकरी यांच्या घरासमोरील नियोजित आंदोलनात जिवती तालुक्यातील या बंजारा महिलांबाबत व त्यांच्या वेशभुषेबाबत सर्वत्र चर्चा केली जात होती, हे येथे उल्लेखनीय. तेलंगणाच्या घुसखोरीपेक्षा विदर्भ बरामंगळवारच्या नागपूर येथील आंदोलनात जिवती येथील बंजारा समाजातील महिला विशेषत्वाने सहभागी झाल्या. याला कारणही तसेच आहे. जिवती तालुक्यातील १४ गावे हे तेलंगणा - महाराष्ट्र दोन्ही राज्यात आहेत. दोन्ही राज्याच्या कचाट्यात या गावांचा विकास खुंटला आहे. या १४ गावात तेलंगणा राज्य नेहमी सोईसुविधा किंवा योजना देऊन घुसखोरी करत असते. विदर्भ राज्य झाल्यास या दोन्ही राज्याच्या कचाटातून ही १४ गावे मुक्त होईल. त्यामुळे विदर्भ राज्य बरा, असे मानत या महिला आंदोलनात गेल्या होत्या.विदर्भ राज्याने जात प्रमाणपत्र तरी निघेलचंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वसलेले लोक हे विषेशकरुन मुळ मराठवाड्यातील आहेत. पण ही जनता येथे येऊन ३५-४० वर्षे झालीत. आता त्यांच्या मुलांचे जात प्रमाणपत्र काढताना अनेक अडचणी येत आहेत. मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यातील मुळ रहिवासी असतील, तेथे त्यांना जावे लागते. पण चंद्रपूर जिल्ह्याचे हल्ली रहिवासी असल्याने त्यांना परत इकडेच पाठविले जाते. दोघांच्या कचाट्यात ही जनता सापडली आहे. म्हणून वेगळा विदर्भ राज्य झाला तर कमीतकमी जात प्रमाणपत्र तरी निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.