शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्याच्या आंदोलनात बंजारा महिला सरसावल्या

By admin | Updated: August 11, 2016 00:40 IST

वेगळा विदर्भ राज्याची मागणी आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण देशात या मागणीची व आंदोलनाची चर्चा होत आहे.

वेशभूषा आंदोलनाचे आकर्षण : आंदोलनस्थळी महिलांच्या पारंपारिक वेशभुषांचीच चर्चासंघरक्षित तावाडे जिवतीवेगळा विदर्भ राज्याची मागणी आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण देशात या मागणीची व आंदोलनाची चर्चा होत आहे. यासाठी वैदर्भियांनी आंदोलने सुरु केली. यात वैदर्भीय जनता मागे नाही. मंगळवारी नागपूर येथे झालेल्या आंदोलनात पुरुषांसह महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यात जिवती तालुक्यातील बंजारा समाजातील महिलांचाही समावेश होता. त्यांनी परिधान केलेली पारंपारिक वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.विदर्भातील शेवटचे टोक तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील बंजारा समाजाच्या महिला स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी अत्यंत आग्रही असल्याचे यावेळी दिसून आले. आपली पारंपारिक वेशभूषा परिधान करुन त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विदर्भ राज्य प्रत्येकाला हवे आहे, विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे, हे या माताभगीनींनी दाखवून दिले आहे. बंजारा समाजातील महिलांसोबतच जिवती तालुक्यातील अनेक महिलाही या आंदोलनात आवर्जुन सहभागी झाल्या. यावरून त्यांच्यातील वेगळ्या विदर्भाची कनव दिसून येत आहे.९ आॅगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूर येथे हे आंदोलन ठेवण्यात आले होते.मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ना. नितीन गडकरी यांनी वेगळा विदर्भ राज्य अशी भाषा वापरली होती. आणि त्याचीच आठवण करुन देण्यासाठी ना. गडकरी यांच्या घरासमोरील नियोजित आंदोलनात जिवती तालुक्यातील या बंजारा महिलांबाबत व त्यांच्या वेशभुषेबाबत सर्वत्र चर्चा केली जात होती, हे येथे उल्लेखनीय. तेलंगणाच्या घुसखोरीपेक्षा विदर्भ बरामंगळवारच्या नागपूर येथील आंदोलनात जिवती येथील बंजारा समाजातील महिला विशेषत्वाने सहभागी झाल्या. याला कारणही तसेच आहे. जिवती तालुक्यातील १४ गावे हे तेलंगणा - महाराष्ट्र दोन्ही राज्यात आहेत. दोन्ही राज्याच्या कचाट्यात या गावांचा विकास खुंटला आहे. या १४ गावात तेलंगणा राज्य नेहमी सोईसुविधा किंवा योजना देऊन घुसखोरी करत असते. विदर्भ राज्य झाल्यास या दोन्ही राज्याच्या कचाटातून ही १४ गावे मुक्त होईल. त्यामुळे विदर्भ राज्य बरा, असे मानत या महिला आंदोलनात गेल्या होत्या.विदर्भ राज्याने जात प्रमाणपत्र तरी निघेलचंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वसलेले लोक हे विषेशकरुन मुळ मराठवाड्यातील आहेत. पण ही जनता येथे येऊन ३५-४० वर्षे झालीत. आता त्यांच्या मुलांचे जात प्रमाणपत्र काढताना अनेक अडचणी येत आहेत. मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यातील मुळ रहिवासी असतील, तेथे त्यांना जावे लागते. पण चंद्रपूर जिल्ह्याचे हल्ली रहिवासी असल्याने त्यांना परत इकडेच पाठविले जाते. दोघांच्या कचाट्यात ही जनता सापडली आहे. म्हणून वेगळा विदर्भ राज्य झाला तर कमीतकमी जात प्रमाणपत्र तरी निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.