शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

बल्लारशाह ते मुंबई रेल्वे धावणार; पण व्हाया औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

बल्लारशाह मुंबई रेल्वे गाडीसंदर्भात येथील नेते मंडळी नवनवे अंदाज बांधत होते व वेळोवेळी घोषणा करीत होते. त्यांच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. ८ एप्रिलला सुरू होणारी बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेस व्हाया औरंगाबाद जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. मागील ३० वर्षांपासून थेट बल्लारशाह-मुंबई रेल्वे गाडीची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.  मुंबईसाठी ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवसच धावणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मागील अडीच वर्षांपासून बल्लारशाह ते मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे बेहाल होते. त्यांना नागपूरला जाऊन गाडी पकडावी लागत होती. ती समस्या आता दूर झाली असून, रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे बल्लारशाह ते मुंबई ही रेल्वे गाडी ८ एप्रिलपासून बल्लारशाह रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे; परंतु ही गाडी थेट मुंबईला जाणार नसून व्हाया आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्यामुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.बल्लारशाह मुंबई रेल्वे गाडीसंदर्भात येथील नेते मंडळी नवनवे अंदाज बांधत होते व वेळोवेळी घोषणा करीत होते. त्यांच्या घोषणा फोल ठरल्या आहेत. ८ एप्रिलला सुरू होणारी बल्लारशाह-मुंबई एक्स्प्रेस व्हाया औरंगाबाद जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. मागील ३० वर्षांपासून थेट बल्लारशाह-मुंबई रेल्वे गाडीची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.  मुंबईसाठी ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवसच धावणार आहे. ही गाडी मुंबईहून रविवार व मंगळवारी रात्री ९.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी बल्लारशाह स्थानकावर ७.५० ला पोहोचेल व इथेच थांबेल आणि बल्लारशाह स्थानकावरून परत मुंबईसाठी सोमवार व बुधवारी रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचेल. 

गाडी थेट नसल्याने प्रवाशांमध्ये गैरसोयही थेट वर्धामार्गे न जाता ही रेल्वेगाडी आदिलाबाद, नांदेड, औरंगाबादमार्गे जाणार असल्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांना सोयीचे झाले आहे; परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची गैरसोय झाली आहे.  

बल्लारशाह मुंबई गाडीसंदर्भात रेल्वे बोर्डाच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी मुंबईला थेट गाडीची मागणी केली होती. याशिवाय मागील तीन वर्षांपासून बल्लारशाह येथे सुरू पीटलाइनचे काम अजून पूर्ण झाले नाही. ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठेकेदाराला बजावले आहे. त्यानंतर थेट गाडी सुरू करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु त्याआधी रेल्वे प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो, याचाही अंदाज रेल्वे प्रशासन घेणार आहे. - जयकरणसिंह बजगोती, डीआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे, बल्लारशाह

 

टॅग्स :railwayरेल्वे