शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाह -गोंदिया पॅसेंजरचा बल्लारपूरला डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी.

वसंत खेडेकरलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : प्रवाशांचा रेटा, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि रेल्वे प्रवासी मंडळ तसेच, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य या सर्वांच्या आग्रहाखातर सामान्य प्रवाशांच्या सोयीची असलेली आणि आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना परवडणारी बल्लारशाह (बल्लारपूर) - गोंदिया ही पॅसेंजर गाडी दीड वर्षानंतर मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, या गाडीचा फेरा दिवसातून एकच (अप व डाऊन) एवढाच सीमित ठेवण्यात आला आहे. तद्वतच तिकीट दरांमध्ये भरमसाट (दुप्पट) वाढ केली आहे. या कारणांनी प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराज झाले. यात भरीस भर या रेल्वेगाडीचा बल्लारशाहपर्यंतचा फेरा बुधवारपासून बंद करण्यात आलेला आहे. ही गाडी आता गोंदियापासून चांदा फोर्टपर्यंत येऊन तिथूनच गोंदियाला परत जात आहे. अशाप्रकारे बल्लारपूरला डच्चू देण्यात आला आहे. बल्लारपूरची ही घोर उपेक्षा आहे.या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी. या मार्गावरील प्रवाशांची संख्या बघता, पूर्वीसारख्याच एकाहून अधिक फेऱ्या होणे गरजेचे आणि प्रवाशांच्या सोयीचे आहे. मंगळवारी ८ डब्यांची ही गाडी बल्लारशाह स्थानकावर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी फलाट क्रमांक एकवर येऊन पोहोचली. २ वाजून १५ मिनिटांच्या परतीच्या प्रवासात येथून ३१ प्रवासी बसलेत. ही गाडी पॅसेंजर म्हणूनच ओळखली जात असली तरी नव्याने तिला रेल्वेच्या भाषेत मेल एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. म्हणूनच असावे, तिकिटाचा दर पूर्वीपेक्षा दुप्पट (पूर्वी ५० रुपये आता ९० रुपये) करण्यात आला आहे. जो सामान्य प्रवाशांना धक्का देणारा आहे.

चांदा फोर्टला प्राधान्यही पॅसेंजर नव्याने सुरू झाल्यानंतर फक्त मंगळवारलाच बल्लारशाहपर्यंत आली. बुधवारपासून फक्त चांदापर्यंत येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून तसा आदेश बल्लारशाह स्थानकाकडे आला आहे. ही गाडी पूर्वीप्रमाणेच बल्लारशाहपर्यंत येणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे