शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बल्लारशाह -गोंदिया पॅसेंजरचा बल्लारपूरला डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी.

वसंत खेडेकरलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : प्रवाशांचा रेटा, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि रेल्वे प्रवासी मंडळ तसेच, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य या सर्वांच्या आग्रहाखातर सामान्य प्रवाशांच्या सोयीची असलेली आणि आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना परवडणारी बल्लारशाह (बल्लारपूर) - गोंदिया ही पॅसेंजर गाडी दीड वर्षानंतर मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, या गाडीचा फेरा दिवसातून एकच (अप व डाऊन) एवढाच सीमित ठेवण्यात आला आहे. तद्वतच तिकीट दरांमध्ये भरमसाट (दुप्पट) वाढ केली आहे. या कारणांनी प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराज झाले. यात भरीस भर या रेल्वेगाडीचा बल्लारशाहपर्यंतचा फेरा बुधवारपासून बंद करण्यात आलेला आहे. ही गाडी आता गोंदियापासून चांदा फोर्टपर्यंत येऊन तिथूनच गोंदियाला परत जात आहे. अशाप्रकारे बल्लारपूरला डच्चू देण्यात आला आहे. बल्लारपूरची ही घोर उपेक्षा आहे.या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी. या मार्गावरील प्रवाशांची संख्या बघता, पूर्वीसारख्याच एकाहून अधिक फेऱ्या होणे गरजेचे आणि प्रवाशांच्या सोयीचे आहे. मंगळवारी ८ डब्यांची ही गाडी बल्लारशाह स्थानकावर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी फलाट क्रमांक एकवर येऊन पोहोचली. २ वाजून १५ मिनिटांच्या परतीच्या प्रवासात येथून ३१ प्रवासी बसलेत. ही गाडी पॅसेंजर म्हणूनच ओळखली जात असली तरी नव्याने तिला रेल्वेच्या भाषेत मेल एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. म्हणूनच असावे, तिकिटाचा दर पूर्वीपेक्षा दुप्पट (पूर्वी ५० रुपये आता ९० रुपये) करण्यात आला आहे. जो सामान्य प्रवाशांना धक्का देणारा आहे.

चांदा फोर्टला प्राधान्यही पॅसेंजर नव्याने सुरू झाल्यानंतर फक्त मंगळवारलाच बल्लारशाहपर्यंत आली. बुधवारपासून फक्त चांदापर्यंत येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून तसा आदेश बल्लारशाह स्थानकाकडे आला आहे. ही गाडी पूर्वीप्रमाणेच बल्लारशाहपर्यंत येणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे