बल्लारपुरात पाळला कडकडीत बंद
By Admin | Updated: February 2, 2017 00:31 IST2017-02-02T00:31:05+5:302017-02-02T00:31:05+5:30
बंद असलेल्या पेपर मिलच्या समस्येवर तोडगा काढून पेपर मिल पूर्ववत सुरु करणे आणि पगार तसेच बोनसची थकीत रक्कम कामगारांना द्यावी, ...

बल्लारपुरात पाळला कडकडीत बंद
बाजारात शुकशुकाट : बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बल्लारपूर : बंद असलेल्या पेपर मिलच्या समस्येवर तोडगा काढून पेपर मिल पूर्ववत सुरु करणे आणि पगार तसेच बोनसची थकीत रक्कम कामगारांना द्यावी, या मागणीकरिता बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघाने पुकारलेल्या बल्लारपूर बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वच प्रतिष्ठाने बंद होती. बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.
पेपर मिल बंद असल्यामुळे त्याचा येथील व्यापारावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी बंदला समर्थन देत दुकाने बंद ठेवली. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. पेपर मिल सुरळीत सुरु व्हावी व थकीत असलेले बोनस व पगार कामगारांना द्यावे, अशा मागणीचे निवेदन येथील एसडीओ शाहुराजे संभाजी मोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी बीआयएमएसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघाचे महामंत्री प्रशांत बहिरम, बल्लारपूर बिझनेस असोसिएशनचे अध्यक्ष नरेश मुंधडा, सैय्यद हसन, के. शंकर, उमेश बोरकर, दीपक मिश्रा, दिलीप शर्मा, तारीक अहमद हे उपस्थित होते.
मागण्यांवर १५ दिवसात सकारात्मक विचार न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)