शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बल्लारपुरात आहेत नानाविध सेल्फीस्थळे, युवावर्ग आकर्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:18 IST

स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध चाललेला असतो. प्रेक्षणीय, थोडे वेगळे ते स्थळ सेल्फीकरिता उपयुक्त ठरतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । ऐतिहासिक, नैसर्गिक, औद्योगिक, धार्मिकस्थळांना पसंती

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : स्वत:चे फोटो स्वत:च आपल्या आवडीने, कुठेही, कधीही काढण्याचा सेल्फीचा हा जमाना आहे. काहींना सेल्फी काढण्याचे एवढे वेड की, आली लहर केला कहर असे सेल्फीचे दिवाने होऊन जातात. एकच स्थळ, एकच फोटो वारंवार काढतात. सेल्फी प्रेमींचा याकरिता नवनवीन स्थळांचा शोध चाललेला असतो. प्रेक्षणीय, थोडे वेगळे ते स्थळ सेल्फीकरिता उपयुक्त ठरतात. बरेच शहर, गाव, खेड्यामध्ये अशी स्थळं आहेत. वर्धा नदी काठावरील बल्लारपूर या ऐतिहासिक शहरात सेल्फीकरिता नाना प्रकारची विविध स्थळ आहेत. जी सेल्फी प्रेमींना आवडतील, आवडत आहेत. वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपासून उभा असलेल्या किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी नदीच्या ऐन तिरावरील राणी महालातील आतील पंचकोनी भाग, नदीकडे उतरण्याकरिता असेलले प्रवेशद्वार आकर्षित करीत आहेत.किल्याला लागूनच वर्धा नदीचे गणपती घाट प्रसन्नता देणारे सेल्फी स्थळ आहे. बारमाही वाहणारी वर्धा माय सेल्फीत आणता येते. वनश्रीची श्रीमंती वा वैभव असे ज्याला म्हणतात, ते खूप मोठ्या लांबीचे व तेवढेच रूंद सागवानाचे लाकूड येथील काष्ट भांडारात दर्शनार्थ ठेवले आहे. त्या लाकडावर त्या त्या वर्षाच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. या भव्य लाकडासोबत सेल्फी न काढले तर नवल. बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसर तर सेल्फीप्रेमींचे अत्यंत आवडीचे ठिकाण झाले आहे. फलाटांवर विविध प्राण्यांचे जिवंत वाटावे असे पुतळे, भिंतीवर नानाप्रकारची वेधक चित्र मन आकर्षून घेतात आणि ते सारे सेल्फीकरिता खुणावतात. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कोणतीही गाडी दहा-पंधरा मिनिटे थांबतेच. येथील नव्याने बांधलेले बसस्थानक हे तर साऱ्यांचे आवडीचे सेल्फी स्थळ झाले आहे.सेल्फी काढताना मात्र काळजी घेणे आवश्यकश्री बालाजी मंदिर हे श्रद्धास्थानही त्यापुढे उभे राहून सेल्फी काढावे असे प्रेक्षणीय आहे. येथील बसस्थानकाच्या सडकेला लागून असलेल्या मोकळया उंच भागावर पेपरमिलच्या दिशेने उभे राहून सेल्फी काढली की पेपर मिलची अवाढव्यता आपल्या मागे फोटोत ठळकपणे दिसते. बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील पावर हाऊस जवळील स्लज टेकडी व घाटरोड सदृश्य भाग सेल्फीचे उत्तम ठिकाण आहे. वर्धा नदीवरील सास्ती तसेच राजुरा पूल हीसुद्धा सेल्फी स्थळ आहेत. बल्लारपूर शहरात सेल्फी स्थळांची कमतरता नाही. सेल्फी काढताना आवश्यक ती काळजी घेणे, तेवढे गरजेचे आहे. अन्यथा एखादा अपघात घडण्याची दुर्दैवी वेळ येण्याची शक्यात असते.

टॅग्स :Selfieसेल्फी