शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

धान उत्पादक शेतकऱ्यांनी फिरविली बाजार समितीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देअल्प दराचा परिणाम : विक्रीसाठी विविध कार्यकारी सोसायट्यांकडे कल

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे. शासनाने यावर्षी काही सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १ हजार ८३५ अधिक ५०० बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे. दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्याकडेच वळविला आहे. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती पदाधिकाºयांनी दिली.धान खरेदी करणाऱ्या सोसायट्याआदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले. त्यामध्ये नवखळा, चिंधी चक, गोविंदपूर, कोजबी (माल), गिरगाव, सावरगाव, जीवनापूर, बाळापूर येथील आदिवासी सोसायट्यांचा समावेश आहे. याशिवाय पणन महासंघाने नागभीड येथील खरेदी विक्री संघ व कोर्धा येथील श्री गुरूदेव राईस मीलच्या सोसायटीलाही धान खरेदी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले.तहसीलदारांनी घेतली सात-बाराची हमीसोसायटीमध्ये धानाची विक्री करायची असेल तर सदर शेतकºयाचा चालू स्थितीतला सात-बारा असणे आवश्यक आहे. सातबाºयासाठी शेतकरी तलाठी कार्यालय जात आहे. मात्र, तलाठी संपावर आहेत. त्यामुळे शेतकºयांची कोंडी सुरू झाली. अनेक शेतकऱ्याना धान विकता येत नाही. संप कधी सुटणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान सातबाऱ्याअभावी धान विक्रीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी धान खरेदी करण्याचे व संप मिटताच तलाठ्यांकडून सात-बारा उपलब्ध करून देण्याची हमी तहसीलदारांनी दिली, अशी माहिती माहिती चिमूर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. आ. राठोड यांनी दिली.धान उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी आता धान विक्री करत आहेत. परंतु, बाजार समितीत धानाची आवक कमी झाली.- सप्तेश गुप्ता, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड.बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमला शेतकरी परत नेत आहेत. शासनाने सोसायटीचे दर बाजार समितीतही लागू केले पाहिजे अन्यथा बाजार समित्या बंद पडण्याचा धोका आहे.- संजय माकोडे, व्यापारी, नागभीड.

टॅग्स :Marketबाजार