शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

धान उत्पादक शेतकऱ्यांनी फिरविली बाजार समितीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देअल्प दराचा परिणाम : विक्रीसाठी विविध कार्यकारी सोसायट्यांकडे कल

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकºयांच्या हातात येते. यानंतर शेतकरी धान विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यावर्षी वेगळेच चित्र दिसून येत आहे. शासनाने यावर्षी काही सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १ हजार ८३५ अधिक ५०० बोनस असे असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे. दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकºयांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्याकडेच वळविला आहे. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती पदाधिकाºयांनी दिली.धान खरेदी करणाऱ्या सोसायट्याआदिवासी विकास महामंडळाने ज्या सोसायट्यांना धान खरेदीचे अधिकार दिले. त्यामध्ये नवखळा, चिंधी चक, गोविंदपूर, कोजबी (माल), गिरगाव, सावरगाव, जीवनापूर, बाळापूर येथील आदिवासी सोसायट्यांचा समावेश आहे. याशिवाय पणन महासंघाने नागभीड येथील खरेदी विक्री संघ व कोर्धा येथील श्री गुरूदेव राईस मीलच्या सोसायटीलाही धान खरेदी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले.तहसीलदारांनी घेतली सात-बाराची हमीसोसायटीमध्ये धानाची विक्री करायची असेल तर सदर शेतकºयाचा चालू स्थितीतला सात-बारा असणे आवश्यक आहे. सातबाºयासाठी शेतकरी तलाठी कार्यालय जात आहे. मात्र, तलाठी संपावर आहेत. त्यामुळे शेतकºयांची कोंडी सुरू झाली. अनेक शेतकऱ्याना धान विकता येत नाही. संप कधी सुटणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान सातबाऱ्याअभावी धान विक्रीसाठी अडचणी येऊ नये, यासाठी धान खरेदी करण्याचे व संप मिटताच तलाठ्यांकडून सात-बारा उपलब्ध करून देण्याची हमी तहसीलदारांनी दिली, अशी माहिती माहिती चिमूर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक जी. आ. राठोड यांनी दिली.धान उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. अनेक शेतकरी आता धान विक्री करत आहेत. परंतु, बाजार समितीत धानाची आवक कमी झाली.- सप्तेश गुप्ता, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड.बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतमला शेतकरी परत नेत आहेत. शासनाने सोसायटीचे दर बाजार समितीतही लागू केले पाहिजे अन्यथा बाजार समित्या बंद पडण्याचा धोका आहे.- संजय माकोडे, व्यापारी, नागभीड.

टॅग्स :Marketबाजार