शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बाबासाहेबांचे कार्य जगासाठी वंदनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:48 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी कार्यामुळे भारतातील शोषितांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी कार्यामुळे भारतातील शोषितांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेले ऐतिहासिक कार्य भारतच नव्हे तर जगासाठी वंदनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, अर्थ, नियोजन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमासाठी पाठविलेल्या संदेशातून केले आहे.मंचावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, अशोक घोटेकर, वामनराव मोडक, अ‍ॅड. राहुल घोटेकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जुल्फी शेख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार संदेशात पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी मूलगामी धोरण तयार केले. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. उपेक्षित समाज घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास साध्य करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. या निर्णयामागे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा आहे. चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही ना. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या संदेशातून दिली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची दीक्षा दिल्याने देशातील कोट्यवधी दलितांची अस्मिता जागृत झाली. गावखेड्यांतील शोषित माणसापर्यंत सामाजिक न्यायाचा विचार पोहोचला. सामाजिक न्यायासाठी आपण कधीही तडजोड करणार नाही, असेही ना. आठवले म्हणाले. कलावंत हेमंत शेंडे व संचाने रात्री प्रबोधनात्मक गीते सादर केली.