शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

१५ तालुक्यांचे वर्षभरातील दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती.

ठळक मुद्दे४९ वर्षांनंतर प्रथमच बदल : नवीन पर्जन्यमानावरून ठरणार दुष्काळ व पूरस्थिती

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा, तालुकानिहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाने तब्बल ४९ वर्षांनंतर प्रथमच बदल केला असून तालुक्यांचे वर्षभरातील नविन दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला यापुढे दुष्काळ व पूरस्थिती जाहीर करताना या सरासरी पर्जन्यमानाचाच आधार घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान सिंदेवाही (१२८९ मिलिमीटर) तर कोरपना तालुक्याचे सर्वात कमी (९९९.८० मिलिमीटर) निश्चित झाले आहे.जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती. १९६१ ते २०१० या कालावधीतील राज्याच्या सर्व तालुकानिहाय सरासरी पर्जमान्यमानाचा विचार करण्यात आला होता. या पर्जन्यमानाचे विश्लेषण करून हवामान विभागाने न्निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमाही नव्याने निश्चित केले आहे.पर्जन्यमानाची अशी होते नोंदसर्वच तालुक्यात मंडळस्तरावर पर्जन्यमान मापक यंत्रे बसविली आहेत. या यंत्रांची देखभाल व नोंदी करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपविण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. तालुका यंत्रणेकडून घेतलेल्या नोंदी वरिष्ठांकडे पाठविल्या जातात. दरवर्षी मान्सून कालावधीत शासनाकडून तयार केलेले पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार होणारेअहवाल जिल्हा व तालुकानिहाय अहवालावर आधारीत असतात. याचे विश्लेषण हवामान विभाग करते. यापुढे जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हवामान विभागाची सरासरी नवीन पर्जन्यमान आकडेवारी अधिकृत मानली जाणार आहे.भारतीय हवामान विभागाने १९६९ ते २०१० या कालावधीतील तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्यमान जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले. यासंदर्भात जारी केलेला शासन निर्णय प्राप्त झाला आहे. दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हे नवीन सरासरी पर्जन्यमान आधारभूत ठरणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान