शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

१५ तालुक्यांचे वर्षभरातील दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती.

ठळक मुद्दे४९ वर्षांनंतर प्रथमच बदल : नवीन पर्जन्यमानावरून ठरणार दुष्काळ व पूरस्थिती

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा, तालुकानिहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाने तब्बल ४९ वर्षांनंतर प्रथमच बदल केला असून तालुक्यांचे वर्षभरातील नविन दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला यापुढे दुष्काळ व पूरस्थिती जाहीर करताना या सरासरी पर्जन्यमानाचाच आधार घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान सिंदेवाही (१२८९ मिलिमीटर) तर कोरपना तालुक्याचे सर्वात कमी (९९९.८० मिलिमीटर) निश्चित झाले आहे.जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती. १९६१ ते २०१० या कालावधीतील राज्याच्या सर्व तालुकानिहाय सरासरी पर्जमान्यमानाचा विचार करण्यात आला होता. या पर्जन्यमानाचे विश्लेषण करून हवामान विभागाने न्निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमाही नव्याने निश्चित केले आहे.पर्जन्यमानाची अशी होते नोंदसर्वच तालुक्यात मंडळस्तरावर पर्जन्यमान मापक यंत्रे बसविली आहेत. या यंत्रांची देखभाल व नोंदी करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपविण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. तालुका यंत्रणेकडून घेतलेल्या नोंदी वरिष्ठांकडे पाठविल्या जातात. दरवर्षी मान्सून कालावधीत शासनाकडून तयार केलेले पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार होणारेअहवाल जिल्हा व तालुकानिहाय अहवालावर आधारीत असतात. याचे विश्लेषण हवामान विभाग करते. यापुढे जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हवामान विभागाची सरासरी नवीन पर्जन्यमान आकडेवारी अधिकृत मानली जाणार आहे.भारतीय हवामान विभागाने १९६९ ते २०१० या कालावधीतील तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्यमान जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले. यासंदर्भात जारी केलेला शासन निर्णय प्राप्त झाला आहे. दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हे नवीन सरासरी पर्जन्यमान आधारभूत ठरणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान