आर्वीची आदर्श गावाकडे वाटचाल; नागरिकांचेही योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:36+5:302021-02-05T07:34:36+5:30
सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती ...

आर्वीची आदर्श गावाकडे वाटचाल; नागरिकांचेही योगदान
सरपंच सेवा संघ संस्थेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ गाव व सुंदर गाव या संकल्पनेच्या माध्यमातून हागणदारीमुक्त, व्यसनमुक्त, जैविक शेती पद्धत, आदर्श ग्राम बनविण्यासाठी आर्वीची वाटचाल सुरू आहे. गावात मशाल दिवंडी घेऊन स्वच्छतेसंबंधी लोकजागृती करणे, स्वच्छता अभियान राबवून गावातील रस्ते झाडून मोकळ्या जागेतील घाण स्वच्छ करणे, गावात गुड मार्निंगचे पाच पथक तयार करून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पुष्प देऊन शौचालयाचा वापर करण्यास सांगणे, यासह इतर उपक्रम राबविले जात आहे. याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
नुकतेच वर्ग पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असल्याने शाळा व शाळेच्या परिसरात फवारणी करून सॅनिटाईझ करण्यात आले. महिलांनी गुडमार्निंग पथक तयार करून स्वत: पहाटे पाच वाजल्यापासून गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही याची खबरदारी घेत आहे. या उपक्रमात सरपंच शालू लांडे, उपसरपंच सुभाष काटवले, सदस्य बंडू आईलवार, भास्कर डोंगे, मारोती महाकुलकर, सुवर्णा महाकुलकर, वंदना मुसळे, उषाताई उपरे, रामटेके, कोहपरे प्रयत्नरत असून, बचतगटाच्या महिला व गावकऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.