शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

अनु. जातीतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे वय घटले

By admin | Updated: June 11, 2015 01:20 IST

अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे (जीओआय) वय घटवण्यात आले आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीअनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गाच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे (जीओआय) वय घटवण्यात आले आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व कुटुंब सांभाळून शिक्षणाचे धडे घेणाऱ्या प्रौढांना यापुढे पदरमोड करूनच उच्च शिक्षण घ्यावे लागणार आहे.अनुसुचित जातीच्या (एस.सी.) उमेदवारांना भारत सरकारतर्फे मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्या अनेक वर्षापासूनची ही योजना आहे. मात्र यावर्षी या योजनेत बदल करण्यात आला असून वयाची पस्तीशी गाठणाऱ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, असे परिपत्रक शासनाने नुकतेच जारी केले आहे.सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामुळे यावर्षी जादा वयाच्या उमेदवारांना शिष्यवृत्तीचे अर्जच दाखल करता आले नाही. ज्यांनी हे परिपत्रक जारी होण्यापूर्वीच शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले होते, त्यांच्यावरही ऐनवेळी शिक्षण शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, प्रात्यक्षिकचा खर्च आणि इतर शुल्क भरण्याची वेळ ओढवली आहे.पूर्वी या शिष्यवृत्तीचा आधार घेऊन अनुसुचित जातीच्या प्रौढ विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेणे शक्य होते. आता मात्र खिशात पैसे असतील, तरच शिकता येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसह शिक्षण घ्यायचे असेल तर वयाची पस्तीशी गाठण्यापूर्वीच तशी योजना तयार करावी लागणार आहे. अन्यथा स्वत:च्या मिळकतीचा काही भाग खर्चुन पुढील शिक्षण घ्यावे लागणार आहे.सध्या रोजगार प्राप्तीसाठीही किमान पात्रता प्राप्त करून आधी करिअर व नंतर शिक्षण असा फंडा वापरला जातो. मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे असा विचार करणाऱ्या सर्वावरच सक्रांत ओढवली आहे. अनुसुचित जाती व नवबौद्ध कुटुंबातील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच असते. त्यामुळे किमान शिक्षण घेऊन आधी रोजगार शोधायचा व त्यानंतर काही वर्षानी पुन्हा उच्च शिक्षण घेत स्वत:ची शैक्षणिक पात्रता वाढवायची अशी पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळेच नोकरीतील बढती किंवा शैक्षणिक पात्रता वाढवण्याच्या इच्छेने शिकणारे अनेक विवाहित व नोकरपेशा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये दिसून येतात. बी.एड., बि.पी.एड, विधी स्थानकोत्तर, एम.फील, एम.एड. एम.कॉम, एम.एससी अशा अभ्यासक्रमाहून त्यांचे शिक्षण सुरू असते.मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे आपले ज्ञान किंवा शैक्षणिक पात्रता वाढविणारे अनुसुचित जातीतील पस्तीशी गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना या आदेशामुळे लगाम लागणार असून अनुसुचित जातीतील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अनेक भंगणार आहे. विविध अभ्यासक्रम कसे शिकणार ?साधरणत: शिक्षणाचा वापर रोजगारासाठी केला जातो. मात्र काहींना रोजगार नसला तरी ते ज्ञान वाढविण्यासाठी पदव्या घेत असतात. त्यामुळेच समाजात माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतोच, असे बोलले जाते. मात्र रोजगार नसल्यावर स्वत:जवळील पैसे खर्च करीत कुणी शिक्षण घेणार नाही. त्यामुळे मानव मरेपर्यंत विद्यार्थी असतो, या प्रथेला या नव्या आदेशाने छेद बसणार आहे.