शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताचा आणखी एक बळी, दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 17:13 IST

एका कार्यक्रमासाठी मुलासोबत दुचाकीने जात असताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ घडली.

ठळक मुद्देगोवरी गावात हळहळ

चंद्रपूर : रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डेअपघातासाठी कारणीभूत ठरत असून या खड्ड्यांमुळे एका महिलेला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ आज सकाळच्या सुमारास घडली. पदमा सुधाकर मादनेलवार(५०) रा. गोवरी ता.राजुरा असे मृत महिलेचे नाव आहे.

राजुरा तालुक्यातील गोवरी येथून तेलंगणा राज्यात एका कार्यक्रमासाठी मुलगा चंद्रशेखर मादनेलवार व त्यांची आई पदमा मादनेलवार सकाळी दुचाकीने निघाले. दुचाकीने मुलासोबत जात असताना सोंडो गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पदमा मादनेलवार दुचाकीवरून खाली कोसळल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यांना देवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोवरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांची स्थिती जैसे थेच असल्याने आता करावे तरी काय, असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे. हे खड्डे अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असूनही यावर काहीच उपाय का केला जात नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातPotholeखड्डेDeathमृत्यू