कोरडा दुष्काळ जाहीर करा
By Admin | Updated: December 1, 2014 22:50 IST2014-12-01T22:50:30+5:302014-12-01T22:50:30+5:30
यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने नागभीड, कोरपना,

कोरडा दुष्काळ जाहीर करा
काँग्रेसचे धरणे : चंद्रपूर, नागभीड, कोरपना, बल्लारपुरात आंदोलन
चंद्रपूर : यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने नागभीड, कोरपना, चंद्रपूर व बल्लारपूर येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर कापसाला ६ हजार रुपये भाव द्यावे, बाजारभावावरील रक्कम बोनस म्हणून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी निर्दशने करुन सरकारचे लक्ष वेधले. चंद्रपूरच्या धरणे आंदोलनात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक बांगडे, सुभाष गौर, प्रदेश सचिव सुनिता लोढिया, अॅड. विजय मोगरे, डॉ. आसावरी देवतळे, प्रमोद राखुंडे, प्रदीप डे, देविदास गेडाम, प्रवीण पडवेकर, सुधीर कारंगल, अॅड. भास्कर पिसे, संजीवनी जोशी, शामबाबू वानखेडे, राजू सारीडके, सुरेश दुर्शेलवार, श्रीकृष्ण नंदूरकर, सचिन चहारे, निखील धनवलकर, राजा काझी, राजकुमार रेवेल्लीवार, अनवर अली, मुन्ना शहा आदी उपस्थित होते.
तर कोरपना येथील आंदोलनात तालुकाध्यक्ष आबीद अली, घनश्याम नंदीकर, विनोद तुमडे, मदन वासेकर, संजय जाधव, जगदीश कोवे, यादव दखणे, आंनदराव सलाम, भाऊराव कारेकर, यशवंत लोंढे आदी उपस्थित होते.
नागभीड येथील आंदोलनाला प्रफुल्ल खापर्डे, डॉ. मोहन जगनाडे, सभापती रेखा जगनाडे, जि. प. सदस्या पद्मा कामडी, माजी सभापती दिनेश गावंडे आदी उपस्थित होते. बल्लारपूर येथील आंदोलनाला तालुकाध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, अब्दुल शेख, नगरसेवक देवेंद्र आर्य, दिलीप माकोडे, भास्कर माकोडे, नासीर खान, अनिल मोतीलाल, विनोद आत्राम, नगरसेविका रजनी मुलचंदानी, शोभा मंहतो, जयकरण सिंह, सतीश करमनकर आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदारांना निवेदन दिले. (स्थानिक प्रतिनिधी)