आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करा
By Admin | Updated: August 26, 2015 00:49 IST2015-08-26T00:49:29+5:302015-08-26T00:49:29+5:30
तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,...

आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करा
आरमोरी : तालुक्यात तलाठ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा,अशी मागणी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यातसुद्धा अत्यंत कमी प्रमाणात यावर्षी पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धानाची रोवणी करणे शक्य झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशाही शेतकऱ्यांचे धानपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे. आॅगस्ट महिना संपत आला असला तरी अजूनपर्यंत जलसाठे कोरडेच आहेत. त्यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी आरमोरीचे उपसभापती चंदू वडपल्लीवार, वसंत गेडाम, मनीषा दोनाडकर, दिलीप घोडाम, अशोक वलादे, अनिल भोयर, टीमराव मडावी, भाऊराव भोयर, लक्ष्मण जांभुळकर, चरणदास जांभुळकर, नानाजी जांभुळकर, बाबुराव जांभुळकर, रामचंद्र जांभुळकर, तानुजी सयाम, नाजुकराव सेलोटे, शिवराम आत्राम, डोमाजी वाघमारे, केवलराम ढालणे, प्रेमदास मनारे, काशिनाथ गेडाम, सोनाली दानी आदी उपस्थित होते.
शासनाने आरमोरी तालुका दुष्काळ घोषित करावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती जाहीर कराव्या, अन्यथा तालुका काँगे्रसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)