लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एमपीएससी परीक्षा तीन दिवसांवर असताना गुरुवारी दुपारी आयोगाने कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचे पत्रक जाहीर केले. इतर विभागाच्या परीक्षा होत असताना केवळ एमपीएससीच्या वेळापत्रात वारंवार बदल होत युवकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली. परीक्षेसाठी सतत तारीख पे तारीख धोरण अवलंबिल्यामुळे युवकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २८ पदांच्या २७० जागांसाठी एमपीएससी राज्यसेवा सामाईक परीक्षा २०२० ची जाहिरात जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाली. त्यामुळे विद्यार्थी जोमाने परिक्षेच्या तयारीला लागले. जाहिरातीनुसार ही परीक्षा ५ एप्रिलला होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोनाना ११ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याची घोषणा झाली. परंतु, तेव्हाही परीक्षा पुढे ढकलून १४ मार्च करण्यात आली. सध्यास्थितीत रेल्वे विभाग, आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, ऐन परीक्षेला तीन दिवस शिल्लक असताना पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्याने युवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
परीक्षेसाठी हॅालतिकीट दिले होतेएमपीएससी परीक्षेची तारीख प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने हॅालतिकीट वेबसाईटवर जनरेट केले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार जिल्हा केंद्र तर ज्या युवकांना केंद बदलविण्याची संधी दिली होती. त्यांना विभागीय स्तरावरील केंद्र दिले होते. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राचे स्थळही गाठले होते. परंतु, ऐन दोन दिवसांचा कालावधी असताना परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
सहाव्यांदा परीक्षा पुढे ढकललीआयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ही परीषा पाच एप्रिल रोजी होणार होती. मात्र कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलून २६ एप्रिल करण्यात आली. त्यानंतर १३ सप्टेंबर करण्यात आली. मात्र याच दिवशी निट परीक्षा आल्याने या परिक्षेची दिनांक २० सप्टेंबर केली. मात्र त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर मराठा व ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलून १४ मार्च करण्यात आली. आत पुन्हा २१ मा र्च करण्यात आली आहे.
इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही
मागील दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या परीक्षा सुरळीत सुरु आहेत. त्यावर कुठलेही निर्बंध लादले नाही.
आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक, सिनिअर क्लर्क, ज्युनिअर क्लर्क, लॅब असिस्टन्स, टेक्निशन आदी पदांच्या परीक्षा घेण्यात आल्या. परंतु, एमपीएससी पुढे ढकलली.
कोरोनाचे कारण देवून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परंतु, इतर विभागाच्या परीक्षा बिनादिक्त सुरु असल्याने रोष व्यक्त होत आहे.
राजकीय सभा, आंदोलन, मोर्चा, नेत्यांच्या मुलांचे थाटात लग्न करताना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नसते. परंतु, एमपीएससी परीक्षा झाली तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असा गोड गैरसमज सरकारचा झाल्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे. - ऐश्वर्य लाकडे, सावली
एमपीएससीचे वेळापत्रक २०१९ ला जाहीर झाले. मात्र अद्याप परीक्षा झाली नाही. मुख्य परीक्षा, मुलाखत, जाइनिंगसाठी पुन्हा एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शक्यता आहे. एका परीक्षेसाठी पाच वर्ष वाया जात असल्याने विद्यार्थ्यात नैराश्य निर्माण होत आहे. - श्रीकांत साव, चंद्रपूर