शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

.. अन् त्या मानसिकरीत्या खचलेल्या मुलीला मिळाला हक्काचा निवारा

By परिमल डोहणे | Updated: June 24, 2023 19:03 IST

Chandrapur News बसस्थानकावर बेवारस स्थितीमध्ये आढळणाऱ्या एका मुलीला चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्या, ॲड. मंजू लेडांगे यांच्या पुढाकाराने स्वाधार गृह महिला आश्रयस्थान येथे राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली.

चंद्रपूर : बसस्थानकावर बेवारस स्थितीमध्ये आढळणाऱ्या एका मुलीला चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्त्या, ॲड. मंजू लेडांगे यांच्या पुढाकाराने स्वाधार गृह महिला आश्रयस्थान येथे राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली. त्यापूर्वी तिची संपूर्ण आरोग्य तपासणी करून तिच्यावर औषधोपचार करण्यात आला. तसेच तिच्या कुटुंबीयांचा शोधही सुरू असून, लवकरच तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

२२ जून रोजी चंद्रपूर बसस्थानकाचे आगारप्रमुखांनी मनसेच्या कार्यकर्त्या ॲड. मंजू लेडांगे यांना फोन करून एक मुलगी मागील दोन ते तीन दिवसांपासून बसस्थानकावरच बेवारस स्थितीत वावरत असल्याचे सांगितले. ॲड. लेडांगे यांनी लगेच बसस्थानक गाठून त्या मुलीजवळ जाऊन तिची विचारपूस केली. ती अत्यंत घाबरली होती. तिला विश्वासात घेऊन तिला धीर दिला. त्यानंतर तिची विचारपूस करण्यात आली. मात्र तिने व्यवस्थित माहिती दिली नाही. ती मानसिकरीत्या खचली असल्याचे दिसून आले. मात्र हिला असेच सोडले तर तिला धोका होऊ शकतो, अशी भीती ॲड. लेडांगे यांना वाटली. त्यांनी लगेच चंद्रपूर रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तिला रामनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आला. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. आशिष मुंधडा यांना ॲड. लेडांगे, अमित भारद्वाज, अभिषेक मोहुर्ले यांच्यासह मनसेचे विजय तुरकयाल, महेश वासलवार, सुनील गुढे, अनिकेत लांजेवार यांना माहिती दिली. तेसुद्धा लगेच रामनगर ठाण्यात पोहोचले. त्यानंतर तिची चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर बालसंरक्षण अधिकारी अजय साखरकर, बालकल्याण समिती अध्यक्ष क्षमा बासरकर धर्मपुरीवार यांच्या सहकार्याने स्वाधार गृह महिला आश्रयस्थान, वसतिगृहात तिची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. ॲड. आशिष मुंधडा, एपीआय योगेश हिवसे यांनी तिला स्वाधार गृह महिला आश्रयस्थानात सोडून दिले. तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू असून, लवकरच तिला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

विकलेल्या घरासमोर सुरू असतो तिचा आकांतॲड. लेडांगे यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या भावाने चंद्रपूर येथील घर विकून तिला असेच सोडून तो पुणे येथे राहण्यास गेला असल्याचे सांगितले. याचा जबर धक्का तिला बसला. ती दररोज आपल्या घरासमोर बसून बंद घराकडे बघत असते अन् रात्री बसस्थानकावर येऊन झोपत असते. परंतु, आता तिला हक्काचा निवारा प्राप्त झाला असून, तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Socialसामाजिक