शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:39 IST

पानवाली आजीबाई ८६ वर्षांच्या; उत्साह मात्र तरुणाईचा!

पी.एच. गोरंतवार

पोंभूर्णा (चंद्रपूर) : वृद्धापकाळाने जगण्याची नांगी टाकून आयुष्य लाचारीने जगणारे वृद्ध काही ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, या परिस्थितीशीही दोन हात करून स्वाभिमानाने आत्मनिर्भर होऊन जगणारे वृद्ध काही कमी नाहीत.

पोंभूर्ण्यात अशीच एक स्वाभिमानी वृद्धा शिक्षणाची दैवत सावित्रीबाई फुले बसस्टॉप चौकात विड्याची पानं विकून वृद्धापकाळाच्या मानगुटीवर लाथ मारून आत्मनिर्भर आयुष्य जगत आहे. ‘पानवाली आजीबाई’ या नावाने ती परिचित आहे. ही तिची न पुसणारी ओळख पोंभूर्ण्याची शान आहे. पोंभूर्णा शहरातील गांधी चौकात वास्तव्यास असलेल्या वच्छलाबाई गजानन बल्लावार (८६) असे या वृद्ध महिलेचे नाव.

वच्छलाबाई यांचे माहेर कोरपना तालुक्यातील परसोडा येथील. त्या सधन शेतकरी कुटुंबातील. घरी १५ एकर शेती. गावातील प्राथमिक शाळेतच त्यांना शिक्षणासाठी टाकण्यात आले. मात्र, शाळेत तेलगू शिक्षण असल्याने त्या गावात शिकल्या नाहीत. भद्रावती येथे मामाच्या गावाला येऊन दुसरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वच्छलाबाईंचे कोवळ्या वयात १५ व्या वर्षी लग्न पोंभूर्ण्यातील दोन एकर शेती असलेल्या गजानन बल्लावार यांच्याशी झाले.

सासरी नवऱ्याचे पेपरमेंट गोळ्यांचे दुकान होते. जिल्हा परिषद व जनता शाळेतील मुले या दुकानात तोबा गर्दी करायचे. म्हणून वच्छलाबाई दुकानात बसू लागल्या. किराणा सामानासोबत विड्याची पानं दुकानात ठेवू लागल्या. आणि यातूनच पुढे विड्याच्या पानांची विक्री सुरू झाली. सुरुवातीला १० रुपयांच्या टोपल्यात ३,५०० विड्याची पाने असायची. १० रुपयांवर मुनाफा म्हणून २५० रु. कमवायच्या. त्यावेळी पानं खाणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने त्या यातून बऱ्यापैकी अर्थार्जन करायच्या. आणलेली पाने विकायला कधी कधी पंधरवडा लागायचा. ही पानं जास्त दिवस टिकावीत, खराब होऊ नयेत म्हणून त्या काळजी घ्यायच्या.

हळूहळू पेपरमेंट गोळ्यांची विक्री काळानुरूप बंद झाली. आसरा होता तो फक्त विड्याच्या पानांचाच. वच्छलाबाईंनी मात्र न डगमगता कंबरेला पदर खोचून व्यवसायाचा डोलारा विड्याच्या पानावर तोलून धरला. वच्छलाबाईंच्या संसाररूपी वेलीवर दोन मुले अंकुरली होती. मुलांचे संगोपन, शिक्षण त्यांनी उत्तमरीत्या केले. मोठा मुलगा अविवाहित राहिला अन् त्याचा वयाच्या पन्नाशीत मृत्यू झाला. लहान मुलगा रवींद्र याचे लग्न व संसाराचा गाडा वच्छलाबाईंनी सुव्यवस्थित बसवून दिला.

‘जिंदगीशी कसलीही तक्रार नाही गा, बाबा’

काळानुरूप आता विड्याचे पान खाणे जवळजवळ बंदच झाले आहे. सुगंधित तंबाखूच्या खर्याला जास्त पसंती आहे. त्यामुळे विड्याची पानं विकणाऱ्यांवर मोठी संक्रांत आली आहे. पण, यावरही मात करत त्या पानाचा व्यवसाय करीत आहेत. भाऊबीज असो, रक्षाबंधन असो, पूजा असो, साक्षगंध असो की लग्न कार्यक्रम असो विड्याची पानं आवश्यकच. सर्वच जण अशावेळी वच्छलाबाईंकडे धाव घेतात. आज विड्याची पानं महागली आहेत. विड्याच्या पानांची टोपली आज १२०० रुपयांची झाली आहे. शेकडा ८० रुपये याप्रमाणे पानं विकली जातात. पूर्वीसारखा मुनाफा आज नसला तरी वच्छलाबाई स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न मात्र अगदी हसतखेळत भागवतात. ‘जिंदगीशी कसलीही तक्रार नाही गा, बाबा’ म्हणणारी ८६ वर्षांची पानवाली आजीबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिकchandrapur-acचंद्रपूर