शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

विड्याची पानं विकून ८६ वर्षीय वृद्धा जगते आत्मनिर्भर आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:39 IST

पानवाली आजीबाई ८६ वर्षांच्या; उत्साह मात्र तरुणाईचा!

पी.एच. गोरंतवार

पोंभूर्णा (चंद्रपूर) : वृद्धापकाळाने जगण्याची नांगी टाकून आयुष्य लाचारीने जगणारे वृद्ध काही ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, या परिस्थितीशीही दोन हात करून स्वाभिमानाने आत्मनिर्भर होऊन जगणारे वृद्ध काही कमी नाहीत.

पोंभूर्ण्यात अशीच एक स्वाभिमानी वृद्धा शिक्षणाची दैवत सावित्रीबाई फुले बसस्टॉप चौकात विड्याची पानं विकून वृद्धापकाळाच्या मानगुटीवर लाथ मारून आत्मनिर्भर आयुष्य जगत आहे. ‘पानवाली आजीबाई’ या नावाने ती परिचित आहे. ही तिची न पुसणारी ओळख पोंभूर्ण्याची शान आहे. पोंभूर्णा शहरातील गांधी चौकात वास्तव्यास असलेल्या वच्छलाबाई गजानन बल्लावार (८६) असे या वृद्ध महिलेचे नाव.

वच्छलाबाई यांचे माहेर कोरपना तालुक्यातील परसोडा येथील. त्या सधन शेतकरी कुटुंबातील. घरी १५ एकर शेती. गावातील प्राथमिक शाळेतच त्यांना शिक्षणासाठी टाकण्यात आले. मात्र, शाळेत तेलगू शिक्षण असल्याने त्या गावात शिकल्या नाहीत. भद्रावती येथे मामाच्या गावाला येऊन दुसरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वच्छलाबाईंचे कोवळ्या वयात १५ व्या वर्षी लग्न पोंभूर्ण्यातील दोन एकर शेती असलेल्या गजानन बल्लावार यांच्याशी झाले.

सासरी नवऱ्याचे पेपरमेंट गोळ्यांचे दुकान होते. जिल्हा परिषद व जनता शाळेतील मुले या दुकानात तोबा गर्दी करायचे. म्हणून वच्छलाबाई दुकानात बसू लागल्या. किराणा सामानासोबत विड्याची पानं दुकानात ठेवू लागल्या. आणि यातूनच पुढे विड्याच्या पानांची विक्री सुरू झाली. सुरुवातीला १० रुपयांच्या टोपल्यात ३,५०० विड्याची पाने असायची. १० रुपयांवर मुनाफा म्हणून २५० रु. कमवायच्या. त्यावेळी पानं खाणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने त्या यातून बऱ्यापैकी अर्थार्जन करायच्या. आणलेली पाने विकायला कधी कधी पंधरवडा लागायचा. ही पानं जास्त दिवस टिकावीत, खराब होऊ नयेत म्हणून त्या काळजी घ्यायच्या.

हळूहळू पेपरमेंट गोळ्यांची विक्री काळानुरूप बंद झाली. आसरा होता तो फक्त विड्याच्या पानांचाच. वच्छलाबाईंनी मात्र न डगमगता कंबरेला पदर खोचून व्यवसायाचा डोलारा विड्याच्या पानावर तोलून धरला. वच्छलाबाईंच्या संसाररूपी वेलीवर दोन मुले अंकुरली होती. मुलांचे संगोपन, शिक्षण त्यांनी उत्तमरीत्या केले. मोठा मुलगा अविवाहित राहिला अन् त्याचा वयाच्या पन्नाशीत मृत्यू झाला. लहान मुलगा रवींद्र याचे लग्न व संसाराचा गाडा वच्छलाबाईंनी सुव्यवस्थित बसवून दिला.

‘जिंदगीशी कसलीही तक्रार नाही गा, बाबा’

काळानुरूप आता विड्याचे पान खाणे जवळजवळ बंदच झाले आहे. सुगंधित तंबाखूच्या खर्याला जास्त पसंती आहे. त्यामुळे विड्याची पानं विकणाऱ्यांवर मोठी संक्रांत आली आहे. पण, यावरही मात करत त्या पानाचा व्यवसाय करीत आहेत. भाऊबीज असो, रक्षाबंधन असो, पूजा असो, साक्षगंध असो की लग्न कार्यक्रम असो विड्याची पानं आवश्यकच. सर्वच जण अशावेळी वच्छलाबाईंकडे धाव घेतात. आज विड्याची पानं महागली आहेत. विड्याच्या पानांची टोपली आज १२०० रुपयांची झाली आहे. शेकडा ८० रुपये याप्रमाणे पानं विकली जातात. पूर्वीसारखा मुनाफा आज नसला तरी वच्छलाबाई स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न मात्र अगदी हसतखेळत भागवतात. ‘जिंदगीशी कसलीही तक्रार नाही गा, बाबा’ म्हणणारी ८६ वर्षांची पानवाली आजीबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिकchandrapur-acचंद्रपूर