शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

By शुभांगी काळमेघ | Updated: September 18, 2025 18:03 IST

Chandrapur : कर्नाटकमध्ये मतदार फसवणुकीचा आरोप; राजुरा मतदारसंघातही काँग्रेसने दाखवले पुरावे

चंद्रपूर : कर्नाटकात झालेल्या मोठ्या प्रमाणातील मतदार फसवणुकीचे प्रकरण आता महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधींनी म्हणाले की, लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी आणि निवडणुकीत फेरफार करण्यासाठी ही संगणकीकृत प्रक्रिया राबवण्यात आली, त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करत निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याऐवजी, पक्षपाती पद्धतीने वागत आहे आणि देशातील लोकशाही प्रक्रियांना कमकुवत करण्यासाठी जबाबदार असलेल्यांना संरक्षण देत आहे. 

कर्नाटकमधील घडामोडींचा तपशील

राहुल गांधींनी असा दावा केला की, कर्नाटकातील अलांड मतदारसंघात ६,०१८ मतदारांची नावे अचानक गायब झाली. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा एका बूथ-लेव्हल अधिकाऱ्याच्या काकाचेच मत यादीतून वगळले गेले होते.

ते म्हणाले की, दलित, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक मतदारांना टार्गेट करून मतदार यादीतून वगळले गेले, जे सामान्यतः विरोधी पक्षांना मतदान करतात.

तसेच त्यांनी एक पुरावाही दिला, ज्यात "गोदाबाई" नावाच्या बनावट लॉगिनने १२ मतदारांचे मत काढून टाकण्यात आले होते. हे लॉगिन आणि यासाठी वापरलेले IP अ‍ॅड्रेस, लोकेशन आणि OTP ट्रेल तपासणीसाठी मागवले गेले, मात्र निवडणूक आयोगाने आजपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. 

राजुरा मतदारसंघातही फसवणुकीचे आरोप

याच पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही अशाच प्रकारच्या फसवणुकीचा दावा केला. त्यांनी सांगितले की, या मतदारसंघात तब्बल ६,८५० मतं अवैध पद्धतीने वाढवण्यात आली.

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात यापूर्वीच पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये अवघ्या १५ दिवसांत ११,६६७ खोट्या मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाली होती, ज्यातील ६,८५३ नावे पुढे मतदार यादीतून वगळण्यात आली. मात्र, ही माहिती फक्त काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर समोर आली.

कोंग्रेसचा आरोप आहे की, या प्रकरणात FIR दाखल होऊनही ११ महिने उलटले तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. "जर एका महिन्यात या प्रकरणात योग्य तपास आणि कारवाई झाली नाही, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू," असा इशाराही लोंढेंनी दिला.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrajura-acराजुराchandrapur-acचंद्रपूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसVotingमतदान