शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

By शुभांगी काळमेघ | Updated: September 18, 2025 18:03 IST

Chandrapur : कर्नाटकमध्ये मतदार फसवणुकीचा आरोप; राजुरा मतदारसंघातही काँग्रेसने दाखवले पुरावे

चंद्रपूर : कर्नाटकात झालेल्या मोठ्या प्रमाणातील मतदार फसवणुकीचे प्रकरण आता महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधींनी म्हणाले की, लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी आणि निवडणुकीत फेरफार करण्यासाठी ही संगणकीकृत प्रक्रिया राबवण्यात आली, त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप करत निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याऐवजी, पक्षपाती पद्धतीने वागत आहे आणि देशातील लोकशाही प्रक्रियांना कमकुवत करण्यासाठी जबाबदार असलेल्यांना संरक्षण देत आहे. 

कर्नाटकमधील घडामोडींचा तपशील

राहुल गांधींनी असा दावा केला की, कर्नाटकातील अलांड मतदारसंघात ६,०१८ मतदारांची नावे अचानक गायब झाली. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा एका बूथ-लेव्हल अधिकाऱ्याच्या काकाचेच मत यादीतून वगळले गेले होते.

ते म्हणाले की, दलित, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक मतदारांना टार्गेट करून मतदार यादीतून वगळले गेले, जे सामान्यतः विरोधी पक्षांना मतदान करतात.

तसेच त्यांनी एक पुरावाही दिला, ज्यात "गोदाबाई" नावाच्या बनावट लॉगिनने १२ मतदारांचे मत काढून टाकण्यात आले होते. हे लॉगिन आणि यासाठी वापरलेले IP अ‍ॅड्रेस, लोकेशन आणि OTP ट्रेल तपासणीसाठी मागवले गेले, मात्र निवडणूक आयोगाने आजपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचं राहुल गांधी म्हणाले. 

राजुरा मतदारसंघातही फसवणुकीचे आरोप

याच पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही अशाच प्रकारच्या फसवणुकीचा दावा केला. त्यांनी सांगितले की, या मतदारसंघात तब्बल ६,८५० मतं अवैध पद्धतीने वाढवण्यात आली.

काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यासंदर्भात यापूर्वीच पत्रकार परिषदेत खुलासा केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये अवघ्या १५ दिवसांत ११,६६७ खोट्या मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाली होती, ज्यातील ६,८५३ नावे पुढे मतदार यादीतून वगळण्यात आली. मात्र, ही माहिती फक्त काँग्रेसच्या पाठपुराव्यानंतर समोर आली.

कोंग्रेसचा आरोप आहे की, या प्रकरणात FIR दाखल होऊनही ११ महिने उलटले तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. "जर एका महिन्यात या प्रकरणात योग्य तपास आणि कारवाई झाली नाही, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू," असा इशाराही लोंढेंनी दिला.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीrajura-acराजुराchandrapur-acचंद्रपूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसVotingमतदान