शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने तेलंगणातून येणारे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतेलंगणात अनेक रुग्ण पाझिटिव्ह : सीमेवरून कोरोना विषाणूची घुसखोरी होऊ नये म्हणून खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : तालुक्यालगत असलेल्या आदिलाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तेलंगणा-महाराष्ट्र सीमा जिवती तालुक्याच्या हाकेच्या अंतरावर आहे. आणि या वादग्रस्त १४ गावात दोन्ही राज्याची विकास यंत्रणा काम करीत असून येथील नागरिकांना तेलंगणा राज्यातून विविध योजनेचा लाभ मिळत असल्याने सर्वाधिक लोक तेलंगणात ये-जा करीत असतात. त्यामुळे तेलंगणा राज्यात झालेली कोरोनाची बाधा सीमेवरील गावात होऊ नये. यासाठी जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद केले आहे.त्यानुसार जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार यांनी सीमेवरील लेंडीगुडा, पळसगुडा, इंदिरानगर, कुंभेझरी, येसापूर गावात बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही व गावातील कुणीही बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे सांगत सर्व मार्ग बंद करून नागरिकांचे समुपदेशन केले जात आहे. जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने तेलंगणातून येणारे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आले आहे. यासाठी जिवतीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार, पोलीस मित्र गजानन राठोड, तालुका कृषी अधिकारी दमाळे, मंडळ कृषी अधिकारी टी.जी.आडे, कृषी सहाय्यक माधव राठोड, नामदेव राठोड यांनी गावा-गावात जाऊन नागरिकांना सतर्क राहत स्वत:ची व परिवाराची काळजी घेण्यास सांगतले. यावेळी कुभेझरी येथील सरपंच अंबादास जाधव, उपसरपंच लहू गोतावळे, सामाजिक कार्यकर्ते जमालूदिन शेख, कैलास महामुने व गावातील तरूणांनी सहकार्य केले.कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनाकोरोनाबाधित तेलंगणा राज्यातील गावात नागरिकांचा संपर्क होऊ नये. यासाठी सर्व मार्ग बंद केले. गावातील दारू, खर्रा, सिगारेट आदी बंद करावेत, कामाव्यतिरिक्त कुणीही बाहेर जाणार नाही, तोंडाला माक्स बांधावे व बाहेरून आल्यावर हात साबनाने स्वच्छ धुवावे, कुठेही गर्दी करू नये.हे तेलंगणातून येणारे मार्ग झाले बंदलेंडीगुडा,पळसगुडा, येसापूर, इंदिरानगर, नारायणगुडा, कुंभेझरी, परमडोली, शंकरलोधी, शेडवाही(बा.), येल्लापूर, भेंडवीसह इतर मार्गही बंद करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस