शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सर्व पोलीस ठाणे सीसीटीव्हीने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी  प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गुन्हेसिद्धीचा दर समाधानकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांचे काम उत्तम असून, गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी खास पथक निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार व सर्व ठाणेदार उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी  प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे. पोलीस दलाच्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रचार व प्रसिद्धी व अन्य उपक्रमांना निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांना सूचविले.

दोषसिद्धीचा दर  ३५ टक्के-कोरोनाकाळात देशात गुन्हे वाढले आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गुन्ह्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१९ मध्ये ४३ टक्के, २०२० मध्ये ४,२५३, तर सप्टेंबर २०२१ अखेर ३५ टक्के दोषसिद्धीचा दर असल्याचे आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी- बैठकीनंतर  पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाच्या डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करणे व गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथकाला निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ. गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी व गुन्हे दर कमी होण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक साळवे यांनी वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण केले.

 

टॅग्स :PoliceपोलिसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार