शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सर्व पोलीस ठाणे सीसीटीव्हीने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी  प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील गुन्हेसिद्धीचा दर समाधानकारक आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांचे काम उत्तम असून, गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असणाऱ्या तालुक्यांसाठी खास पथक निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार व सर्व ठाणेदार उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करताना घटनेचा सांगोपांग विचार करून दोष सिद्धीचे अंतिम लक्ष डोक्यात ठेवावे. एकदा गुन्हा दाखल झाला तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, अशी भीती गुन्हे करणाऱ्यांना वाटावी. गुन्हेस्थळांवर पोहोचण्यासाठी पोलिसांनी दुचाकी व चारचाकी वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचे पालकमंत्र्यांनी निर्देश दिले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी  प्रादेशिक परिवहन व पोलीस या यंत्रणांनी चोखपणे काम करावे. पोलीस दलाच्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रचार व प्रसिद्धी व अन्य उपक्रमांना निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे पोलीस अधीक्षकांना सूचविले.

दोषसिद्धीचा दर  ३५ टक्के-कोरोनाकाळात देशात गुन्हे वाढले आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गुन्ह्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. २०१९ मध्ये ४३ टक्के, २०२० मध्ये ४,२५३, तर सप्टेंबर २०२१ अखेर ३५ टक्के दोषसिद्धीचा दर असल्याचे आढावा बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी- बैठकीनंतर  पालकमंत्र्यांनी पोलीस विभागाच्या डायल ११२ प्रकल्प नियंत्रण कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्ष अत्याधुनिक करणे व गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथकाला निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ. गुन्हेगारांना वचक बसण्यासाठी व गुन्हे दर कमी होण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक साळवे यांनी वर्षभरातील कामकाजाचे सादरीकरण केले.

 

टॅग्स :PoliceपोलिसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार