मोदी लहरने अहीरांची ऐतिहासिक हॅट्ट्रिक
By Admin | Updated: May 16, 2014 23:53 IST2014-05-16T23:53:12+5:302014-05-16T23:53:12+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विक्रमी मते घेवून विजयाची हॅट्रीक ..

मोदी लहरने अहीरांची ऐतिहासिक हॅट्ट्रिक
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विक्रमी मते घेवून विजयाची हॅट्रीक साधत राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा २ लाख ३६ हजार २६९ मतांनी दारूण पराभव केला. अंतर्गत गटबाजीची काँग्रेसला बसलेली ही चपराक पुढील राजकारणासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीपर्यंत ती सातत्याने कायम राहिली. मतदार संघातील एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदारांपैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत हंसराज अहीर यांना पाच लाख ८ हजार ४९ एवढी मते पडली तर काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८0 मते घेतली. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते व आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ एवढय़ा मतांवरच समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हंसराज कुंभारे हे ४९ हजार २२९ एवढी मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ उमेदवार रिंगणात होते. वरील तीन प्रमुख उमेदवार वगळता १५ उमेदवारांची डिपाझीट जप्त झाली. यात बसपाचे हंसराज कुंभारे यांच्यासह अशोक खंडाळे (रिपाइं), कुरेशी म. इखलाख म. युसूफ, रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), नितीन वसंतराव पोहाणे, नंदकिशोर गंगाराम रंगारी, पंकजकुमार शर्मा (तृणमुल काँग्रेस), फिरोज उस्मान खान पठाण, सिध्दार्थ रमेशचंद्र राऊत, अतुल अशोक मुनगीनवार, कार्तीक गजानन कोडापे, नामदेव माणिकराव शेडमाके, प्रमोद मंगरुजी सोरते, विनोद दिनानाथ मेश्राम, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे. संजय देवतळे दुसर्या क्रमांकावर असले तरी विजयी उमेदवारातील अंतर बरेच मोठे आहे. आम आदमी पक्षाचे वामनराव चटप यांचे मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा वाढले आहे. असे असले तरी अनेकांचे निवडणूकपूर्व अंदाज मात्र चुकले आहेत. दरम्यान, येथील उद्योग भवनात मतमोजणी केली जाणार असल्याने शुक्रवारी सकाळी ७.३0 वाजपासून नागरिकांची बसस्थानक व उद्योगभवन परिसरात गर्दी होऊ लागली. मात्र सकाळी ८.३0 वाजेपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी मतमोजणीला सुरुवातही केलेली नव्हती. त्यामुळे उत्सुक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.