शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कृषी, संलग्न सेवा व ग्रामीण विकासाची कामे रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

जिल्हा वार्षिक आराखड्यात कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे, पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग, खाण, ...

जिल्हा वार्षिक आराखड्यात कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास कार्यक्रम, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे, पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग, खाण, परिवहन, सामान्य सेवा व सामान्य आर्थिक सेवा अशा नऊ क्षेत्राचा समावेश करण्यात आला. यातही गाभा व बिगर गाभा क्षेत्रासाठी ९५ टक्के तरतूद करण्यात आली. अंमलबजावणी यंत्रणांची मागणी लक्षात घेऊन या नऊ क्षेत्रासाठी ४ हजार ९७५ कोटी ५८ लाखाचा नियतव्यय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर नागपुरातील विभागीय बैठकीत अर्थमंत्री अजित पवार हे किती कोटीचा निधी मंजूर करतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. सोमवारी ही बैठक पार पडली. ग्रामीण विकासासाठी जिल्ह्याच्या ठरविलेल्या १८० कोटी ९५ लाखाच्या सूत्रापेक्षा अतिरिक्त ७० कोटी रुपये मंजूर करीत केवळ २५० कोटीच्या आराखड्याला अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामुळे हा अल्प निधी विविध विभागांना वितरित करताना मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री

विजय वडेट्टीवार यांनी ३२१ कोटीची अतिरिक्त मागणी केली. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीतच त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याने जिल्ह्याची बोळवण झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

पाणीपुरवठा योजना अडचणीत

निधीअभावी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अडचणीत आहे. जिल्हा परिषदेनेही या योजनांसाठी निधीची मागणी केली होती. आरोग्यासाठी निधी उपलब्ध आहे. मात्र, अन्य योजनांसाठी निधी नसल्याने अनिष्ट परिणाम होणार आहे. सामाजिक कल्याण, अनुसूचित जाती-जमाती कल्याणकारी योजनाच्या निधीची गरज आहे. निधीअभावी योजना गुंडाळून ठेवण्यात आल्या. त्यामुळे अतिरिक्त निधी मिळाला तरच कृषी संलग्न सेवा, ग्रामीण विकास व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊ शकतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.