अंगठी विकून दहा युवक पोहचले स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:52+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील पिपर्डा येथील सहा, वनसडी, लोणी, गडचांदूर, चंद्रपूर येथील प्रत्येकी एका युवकाचा समावेश आहे. हे सर्व युवक आदिवासी समाजातील असून ते दमण येथे कामासाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे सतर दिवस त्यांना आपल्या खोलीतच अडकून पडले. शेवटी गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी कोरपना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांच्याशी संपर्क साधला. हाताला काम नाही.

अंगठी विकून दहा युवक पोहचले स्वगृही
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कामाच्या शोधासाठी दमण गाठले. दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. परिणामी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शेवटी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने गावी परतन्याची परवानगी मिळाली. खासगी वाहन करण्यासाठी त्यांना तीस हजार रूपयांची गरज होती. मात्र ऐवढी रक्कम नसल्याने दोघांना आपली सोन्याची अंगठी विकावी लागली. ही व्यथा आहे, कोरपना तालुक्यातील दहा आदिवासी युवकांची.
चंद्रपूर जिल्ह्यातील पिपर्डा येथील सहा, वनसडी, लोणी, गडचांदूर, चंद्रपूर येथील प्रत्येकी एका युवकाचा समावेश आहे. हे सर्व युवक आदिवासी समाजातील असून ते दमण येथे कामासाठी गेले होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे सतर दिवस त्यांना आपल्या खोलीतच अडकून पडले. शेवटी गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांनी कोरपना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांच्याशी संपर्क साधला. हाताला काम नाही. पेसे जवळपास संपले आहे. घरमालक भाड्यासाठी तगादा लावत आहे, अशी आपबिती त्यांनी सांगितली. त्यांची व्यथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यापर्यंत पोहचविली. दमण येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षास संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे परतीसाठी साकडे घालण्यात आले. त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना माहिती दिली.
सीईसो कर्डिले यांचे मित्र दमण येथील जिल्हाधिकारी आहे. त्यांच्या सीमेवरील ठाणे जिल्ह्यात त्यांना पोचविण्याची व्यवस्था केली. तेथून खासगी वाहनाने ते स्वगृही पोहचले.
आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून हिरमोड
सदर मुले ठाणे येथील आदिवासी आयुक्त कार्यालय गाठल्यानंतर आपली आपभीती कथन केली. त्यांना रात्रभर ताटकळत कार्यालयात बसवून ठेवण्यात आले. मात्र कोणताही पर्याय काढल्या नसल्याचा आरोप त्या युवकांनी केला. त्यानंतर स्वत:च स्वगृही जाण्यांनी निर्णय घेतला मात्र गाडीसाठी पैसे नसल्याने दोघांनी स्वत:ची सोन्याची अंगठी विकून ३० हजार रुपये भाडे देऊन गावाला आल्याचे विपूल तोडासे, प्रकाश कोलचाडे, लक्ष्मण मडावी यांनी सांगितले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.