शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

छाणनीनंतर 12 हजार 212 नामांकन अर्ज ठरले वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३  ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. 

ठळक मुद्दे१७५ नामांकन अवैध : वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२,१६१

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १२ हजार ३८७ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. शु्क्रवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत १७५ नामांकन अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६१ आहे. वरोरा तालुक्यात सर्वाधिक २८ नामांकन अर्ज बाद झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३  ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयात नामांकन अर्जाची छाननी सुरू करण्यात आली. प्राप्त झालेल्या १२  हजार ३८७ नामांकनापैकी १७५ अर्ज अवैध तर १२ हजार २१२ अर्ज वैध ठरल्याची  माहिती जाहीर करण्यात आली. काही उमेदवारांनी दोन नामांकन दाखल केले. त्यामुळे वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या १२ हजार १६२ झाली आहे. मतदारांना ५ हजार  १५१  सदस्यांना निवडून द्यायचे आहे. 

ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रांची त्रुटी भोवलीयंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणकीकृत ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविली. त्यासाठी १५ कागदपत्र जोडणे बंधनकारक होते. मात्र, माहिती आणि वेळेचा अभाव या दोन कारणांमुळे नामांकन अर्जात त्रुटी राहिल्या. त्यामुळे १७५ नामांकन अर्ज आजच्या छाननी प्रक्रियेत अवैध ठरले.

४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार    १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी उमेदवारांना ४ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप  केले जाईल,  माहिती उपजिल्हाधिकारी निवडणूक यांनी  दिली. ४ जानेवारीला नामांकन मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या समथर्थकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या. ग्रामीण भागातील चावडीवर राजकीय घडामोडींबाबत चर्चेला ऊत आला आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत गावागावात विविध घडामोडींना वेग येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक