शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

थकबाकीदार कृषीपंपधारकांवर कारवाई होणार

By admin | Updated: October 30, 2014 22:48 IST

कृषी पंपधारकांचे करोडो रुपयाचे वीज बिल थकीत होते. शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरता यावे, यासाठी शासनाने यावर्षी कृषी संजीवनी योजना सुरु केली. मात्र, शेकडो कृषी पंपधारकांकडे वीज बील थकीत आहे.

चंद्रपूर : कृषी पंपधारकांचे करोडो रुपयाचे वीज बिल थकीत होते. शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरता यावे, यासाठी शासनाने यावर्षी कृषी संजीवनी योजना सुरु केली. मात्र, शेकडो कृषी पंपधारकांकडे वीज बील थकीत आहे. उद्या ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपणार असून मुदतीनंतर थकबाकीदार असणाऱ्या कृषीपंपधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषीपंपधारकांनी थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन वीज वितरणने केले आहे.१ मार्च २०१४ पर्यंतच्या एकूण थकबाकीपैकी ५० टक्के मुळ मुदल व त्यापुढील सर्व चालू वीज बील भरुन कृषी संजीवनी योजनेत सहभागी होता येणार होते. नियमाप्रमाणे ५० टक्के मुळ मुदल रक्कम व त्यापुढील सर्व चालू वीज बील भरल्यास थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याच्या थकबाकीतील १०० टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. कृषी संजीवनी योजनेचा नागपूर परिमंडळातील १४ हजार ६६८ शेतकऱ्यांना लाभ झाला. त्यांनी थकीत वीज बिलाच्या स्वरुपात सप्टेंबर महिन्यापर्यंत ४ कोटी १० लाख रुपये भरले. मात्र, आजही अनेक कृषी पंपधारकांकडे वीज बील थकीत आहे. कृषी संजीवनी योजनेत ३१ आॅगस्टपर्यंत ज्या थकीतदारांनी वीज बिलाचा भरणा केला, अशा ग्राहकांचे अर्धे बिल माफ करण्यात आले. तर ज्याना अर्धे वीज बिल एकाच वेळी भरणे शक्य झाले नाही, त्यासाठी तीन हप्त्यात बिल भरण्याची सुविधा देण्यात आली. मात्र, ३१ आॅक्टोबरला या योजनेची मुदत संपणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)