कर्णकर्कश वाहनांवर कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:23+5:302021-02-20T05:23:23+5:30
वाहन पार्किंगसाठी फुटपाथचा वापर चंद्रपूर : येथील महात्मा गांधी, कस्तुरभा रोड ते पठाणपुरा गेटपर्यंत फुटपाथवर वाहन पार्किंग केल्या जात ...

कर्णकर्कश वाहनांवर कारवाई करावी
वाहन पार्किंगसाठी फुटपाथचा वापर
चंद्रपूर : येथील महात्मा गांधी, कस्तुरभा रोड ते पठाणपुरा गेटपर्यंत फुटपाथवर वाहन पार्किंग केल्या जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेची लोकमान्य टिळक शाळेजवळ अनेकजण चारचाकी वाहने उभे ठेवतात. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या बहुतांश कार्यालयात अस्वच्छता आहे. त्यामुळे या कार्यालयांनी प्रथम स्वत:ची कार्यालये स्वच्छ करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही प्रभागात मागील काही दिवसांपासून सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने अनेक उपकरणे बंद चालू होत असतात. तर काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. याबाबत येथील नागरिकांनी वीज कंपनीकडे तक्रार केली आहे. मात्र वीज कंपनीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्राहकांत रोष पसरला आहे.
बोगस डॉक्टरांवर कारवाई करा
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही दुर्गम गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. बोगस डॉक्टर असून रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेने यासंदर्भात मोहीम सुद्धा राबविली होती.
सुविधांकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ मिळण्याचा उद्देश आहे. मात्र अनेक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित नसतात.