शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पीक कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:51 PM

शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांच्यासह खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी बँकांना निधी देण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकºयांना विनाविलंब सुलभतेने कर्ज मिळावे, यासाठी शासन पुढाकार घेत आहे. काही बँका या मोहिमेला गती देत नसल्याचे दिसून आले. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल. बँकांना केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात आला. विविध योजनांचा निधी बँकांच्या खात्यात ठेवण्यात आला. शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, तर ही खाती बंद करून अन्य बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल, असेही ना. अहीर यांनी नमुद केले.खासगी व जिल्हा बँकांमध्ये समन्वय ठेवून कर्ज वाटप करावे. राष्ट्रीयीकृत बँकांनी या मोहिमेमध्ये अत्यल्प कर्ज वाटप केल्याने संबंधित अधिकाºयांना या बैठकीत धारेवर धरण्यात आले. अ‍ॅक्सिस बँक, अलाहाबाद बँक, बडोदा व सिंडिकेट बँकांनी अत्यल्प कर्ज वितरण केले. या बँकांनी कर्ज वितरणामध्ये गती आणावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज वाटप करताना अडचणी पुढे आल्या. त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकºयांना अधिकाधिक लाभ देताना नियमांमध्ये शिथिलता आणावी. यातील त्रासदायक अटी बदलण्याची ग्वाही ना. अहीर यांनी दिली. यावेळी आमदार धोटे यांनी राजुरा मतदारसंघातील जिवती, कवठाळा व पाटण येथे शेतकºयांना बँकांचे अधिकारी सहकार्य करीत नाही, असा आरोप केला. अशा बँकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, बँकेमध्ये जमा झालेल्या रकमा आणि यावर्षी शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जाबाबत बँकांनी ताळमेळ बसवावा. शेतकºयांची कोणत्याही स्थितीत अडवणूक करू नका, अशी सूचनाही केली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा यांनी जिल्ह्यातील बँकेच्या कर्ज वाटप मोहिमेतील सहभागाची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी तालुकानिहाय वाटप केलेल्या कर्जाची माहिती सादर केली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ६० हजार पात्र शेतकºयांना ३३७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ५५ टक्के वाटा उचलला आहे.