शिक्षकांनी ज्ञानरचनावादी पद्धतीचा स्वीकार करा
By Admin | Updated: November 16, 2015 00:50 IST2015-11-16T00:50:37+5:302015-11-16T00:50:37+5:30
शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हक्कासोबतच कर्तव्याची जाणिव ठेवत अध्यापनाचा पारंपरिक भूमिका बदलवून ...

शिक्षकांनी ज्ञानरचनावादी पद्धतीचा स्वीकार करा
मधुकर काठोळे : राजुरा येथे पार पडले तालुकास्तरीय अधिवेशन
राजुरा : शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या हक्कासोबतच कर्तव्याची जाणिव ठेवत अध्यापनाचा पारंपरिक भूमिका बदलवून ज्ञानरचनावादी पद्धतीचा स्वीकार करीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन म.रा.प्रा. शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस मधुकर काठोळे यांनी केले.
राजुरा येथील विश्रामगृहामध्ये गुरूवारी म.रा.प्राथ. शिक्षक संघाच्या तालुकास्तरीय अधिवेशन पार पडले. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अंशदायी पेंशन योजना, शाळेसाठी मोफत वीज, केंद्रस्तरावर डाटा आॅपरेटर, मुख्यालयाची अट शिथिल, पदोन्नती, याबाबत संघटनेचा लढा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजकुमार वेल्हेकर होते तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा नेते जी.जी. धोटे, सचिव जे.डी. पोटे, शिक्षण स.सदस्य संतोष कुंटावार, किशोर उरकुंडवार, मारोती जिल्हेवार, सुभाष बेरड, विठ्ठल आवारी, जगदीप दुधे, सुधीर मोहरकर, पंढरी डाखरे, शंकर गोरे, नारायण तेल्कापल्लीवार, दादा राऊत, नीळकंठ साळवे, बंडू मडावी, बंडू राठोड, पंढरी मरसकोल्हे, गिरीधर पानघाटे, बाळकृष्ण मसराम, दिलीप साखरकर, धर्मा उदे, विनोद बारसागडे, विष्णू बढे, नायगमकर, लक्ष्मण सोयाम यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना धोटे यांनी पतसंस्थेतील ज्या शिक्षकांच्या नावे बोगस कर्जाची उचल केली त्यांना संघटनेतर्फे न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले, तर प्रास्ताविकामधून जे.डी. पोटे यांनी शिक्षकांचा महाराष्ट्र संघात प्रवेश सोहळा आयोजित करण्याबाबतची भूमिका विषद करून प्रामाणिक शिक्षकांनाच या संघटनेत स्थान असून शेकडो शिक्षकांना या संघटनेत प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेणारे सुभाष बेरड, विठ्ठल आवारी, नारायण तेल्कापल्लीवार, पंढरी मरसकोल्हे यांचे कौतुक केले. याप्रसंगी सुभाष बेरड, संतोष कुंटावार, किशोर उरकुंडवार यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश घेतलेल्या सर्वांचे जिल्हाध्यक्ष राजकुमार वेल्हेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालन इरफान शेख, तर आभार दशरथ धवने यांनी मानले. यशस्वीतेसाठी विठ्ठल गावंडे, संतोष पावडे, रामरतन चाफले यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)