शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

उद्योगाचे नाव, प्रदूषणाचे गाव : घुग्घूससह गडचांदूर शहरावरही घोंगावतेय जीवघेणे वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 11:14 IST

अंबुजा, माणिकगड हे उद्योग गडचांदूरला लागून तर अल्ट्राटेक आणि दालमिया हे उद्योग या शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर आहेत.

ठळक मुद्देप्रदूषण नियंत्रणाचे नियम भरदिवसाही तुडविले जाताहेत पायदळी

राजेश भाेजेकर / आशिष देरकर

गडचांदूर (चंद्रपूर) :चंद्रपूर जिल्ह्यासाठी उद्योग हे वरदान असल्याचे वरवर वाटत असले तरी वास्तविकता अभिशाप वाटणारी आहे. जिल्ह्यात मोठ्या उद्योगांमध्ये सिमेंट उद्योगांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर सर्वकाही आलबेल दिसणाऱ्या या उद्योगांच्या प्रदूषणाचे वादळ घुग्घूससह गडचांदूर शहरावर घोंगावत आहे.

गडचांदूर हे नगरपालिका असलेले शहर चंद्रपूरपासून दक्षिणेस सुमारे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे शहर म्हणजे ‘सिमेंट उद्योगांचे हब’ आहे. अंबुजा, माणिकगड हे उद्योग गडचांदूरला लागून तर अल्ट्राटेक आणि दालमिया हे उद्योग या शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर आहेत. या उद्योगांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे या परिसरातील हजारोंच्या संख्येतील जनता कमालीची त्रस्त आहेत. मात्र त्यांची हाक ना जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापर्यंत पोहोचत नाही. राज्य शासन तर दूरच राहिले.

गडचांदूरसह परिसरातील गावांवर दिवसभर प्रदूषणाचे धुके पसरलेले असते. यामुळे श्वास घेताना गुदमरल्यासारखे वाटते. या उद्योगांतून रोज शेकडो ट्रक ये-जा करतात. यामुळेही प्रदूषणात भरच पडत आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणत्याही संबंधित शासकीय यंत्रणेला नाही. या प्रदूषणाविरोधात गडचांदूरातील जनतेने कृती समिती स्थापन करून हजारो लोकांनी स्वाक्षरीनिशी निवेदन सादर केले होते. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष भेट देऊन माणिकगढ सिमेंट उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली असता धक्कादायक बाब उजेडात आली. या या उद्योगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत उत्तर सादर करण्याचेही बजावले आहे. आता ही कंपनी काय उपाययोजना करते हे बघण्यासारखे आहे.

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अतुल सातफडे यांनीही माणिकगढ सिमेंट कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची बाब प्रत्यक्ष पाहणीत आढळून आली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सात दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धूर, धुके अन् प्रदूषण

- दिवसभर रस्त्याने धूळ उडत असते.

- कंपनीकडे बघितल्यास आकाशात धुके पसरलेले दिसते. पलीकडे काहीच दिसत नाही. गडचांदूर शहरापासून काहीच अंतरावर राजुरा मार्गावर कंपनीचा लोहमार्ग आहे. येथे ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात.

- एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणतो, आम्ही या शहरातील प्रदूषणामुळे त्रस्त आहोत.

- सुसाट ट्रक्समुळे अनेकांचा अपघाती बळी, किरकोळ अपघात नेहमीचेच.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूरair pollutionवायू प्रदूषणVidarbhaविदर्भ