शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

कर्जमाफी योजनेपासून ९० शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:26 AM

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत ...

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्ग, लाॅकडाऊन, सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, नवीन कर्ज देण्यास बँकांचा नकार, अशा विवंचनेत शेतकरी सापडला असून, जगू की मरू, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतीकरिता गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी नियमित कर्ज योजनेचा लाभ घेतला. परंतु सततच्या नापिकीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने कर्ज थकीत राहात आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत असतानाच तत्कालीन युती शासनाने आणि विद्यमान आघाडी सरकारनेही शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मोठ्या आनंदाने शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा रितसर अर्ज भरला आणि कर्ज माफ होणारच, अशा आशेवर शेतकरी होते.

परंतु शासकीय घोडचूक, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यामुळे शेकडो शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

याबाबत वंचित शेतकऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत हाकलून देत आहेत. दरम्यान, लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, सहकारमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

अगोदरच कोरोना संकट, सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि पात्र असतानाही कर्जमाफीपासून वंचित झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने दखल घेऊन तत्काळ न्याय देण्याची मागणी शेतकरी किशोर कासनगोट्टूवार, पांडुरंग भगत, बंडू गौरकार, संदीप मोरे आदींनी केली आहे.