शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांत हरवलेल्या ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत घडविले पुनर्मिलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:18 IST

Chandrapur : 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'

मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत हरवलेल्या (१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४) रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), चाइल्ड लाइन व लोहमार्ग पोलिसांच्या सहकार्याने ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत पुनर्मिलन घडवून आणले. यात ५८९ मुले व २७२ मुलींचा समावेश आहे.

आरपीएफकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, ते सुटका केलेल्या मुलांसाठी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मानकीकृत कार्यप्रणालीद्वारे अनिवार्य केलेली जबाबदारी पार पाडत आहेत आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मुलांची सुटका करण्यासाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहेत. 

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर असलेल्या चाइल्ड लाइनने आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने घरून पळून आलेली भिक्षेकरी व इतर १२७ बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर केले. 

तर मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरून एप्रिल २०२४ मध्ये ५६, जूनमध्ये ९३, जुलैमध्ये ९५, ऑगस्टमध्ये २०२, सप्टेंबरमध्ये १४१, ऑक्टोबरमध्ये १६० व नंतर ११४. यामध्ये ५८९ मुले व २७२ मुली अशा एकूण ८६१ मुलांना आरपीएफने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत त्यांच्या पालकांसोबत मनोमिलन घडवून आणले.

असे चालते कार्य गेल्या काही वर्षापासून भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर, आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून पळून मुले रेल्वे स्थानकावर येतात व प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात व जीआरपी पोलिसांकडे सोपवून चाइल्ड लाइनच्या मदतीने त्यांना पालकांकडे सोपवले जाते. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.

"आजपर्यंत आरपीएफच्या मदतीने अनेक मुलांना त्यांचे आईवडील, नातेवाईक मिळाले आहेत. यात आरपीएफचे भरपूर योगदान आहे." - भास्कर ठाकूर, समन्वयक चाइल्ड लाइन, बल्लारशाह रेल्वे स्थानक.

टॅग्स :Policeपोलिसrailwayरेल्वे