शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

८,४४० वाहनधारकांना विनाकारण फिरणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची कारवाई : ६६७ वाहने जप्त; मोजावी लागली १० लाखांवर दंडाची रक्कम

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना घराबाहेर पळू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहे. तरीही नियमांची पायमल्ली सुरू असल्याची बाब पोलिसांनी केलेल्या वाहनधारकांवरील कारवाईतून दिसून येते. वाहतुक नियंत्रण शाखेने २४ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविली. यामध्ये तब्बल ८ हजार ४४० वाहनांवर कारवाई केली असून दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे. यामध्ये ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.लॉसकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. तरीही काही वाहनधारक विनाकारण घराबाहे पडत आहे. अशांवर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस नाकाबंदीदरम्यान कसून तपास करीत आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजार ४४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.4034 अनपेड कारवाईवाहतूक पोलिसांनी महिनाभरात आठ हजार ४४० कारवाई केल्या. यामध्ये चार हजार ४०६ पेड कारवाईमध्ये दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर चार हजार ३४ अनपेड कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतील दंड १५ दिवसांच्या आत भरण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या आहेत. तर ६६७ वाहने जप्त केली आहेत.वाहनचालकांचे समुपदेशनकोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये, घरीच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा शब्दात वाहनचालकांना समुपदेशन करण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.292 जमावबंदीच्या कारवायाकोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. त्यानुसार कलम १८८ अन्वये आतापर्यंत २९२ कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा धोका असल्याने कुणीही विनाकारण बाहेर निघू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र अनेकजण उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा वाहन चालकिांविरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार दंड आकारण्यात आला.- हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस