शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

८,४४० वाहनधारकांना विनाकारण फिरणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची कारवाई : ६६७ वाहने जप्त; मोजावी लागली १० लाखांवर दंडाची रक्कम

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना घराबाहेर पळू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहे. तरीही नियमांची पायमल्ली सुरू असल्याची बाब पोलिसांनी केलेल्या वाहनधारकांवरील कारवाईतून दिसून येते. वाहतुक नियंत्रण शाखेने २४ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविली. यामध्ये तब्बल ८ हजार ४४० वाहनांवर कारवाई केली असून दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे. यामध्ये ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.लॉसकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. तरीही काही वाहनधारक विनाकारण घराबाहे पडत आहे. अशांवर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस नाकाबंदीदरम्यान कसून तपास करीत आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजार ४४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.4034 अनपेड कारवाईवाहतूक पोलिसांनी महिनाभरात आठ हजार ४४० कारवाई केल्या. यामध्ये चार हजार ४०६ पेड कारवाईमध्ये दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर चार हजार ३४ अनपेड कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतील दंड १५ दिवसांच्या आत भरण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या आहेत. तर ६६७ वाहने जप्त केली आहेत.वाहनचालकांचे समुपदेशनकोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये, घरीच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा शब्दात वाहनचालकांना समुपदेशन करण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.292 जमावबंदीच्या कारवायाकोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. त्यानुसार कलम १८८ अन्वये आतापर्यंत २९२ कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा धोका असल्याने कुणीही विनाकारण बाहेर निघू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र अनेकजण उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा वाहन चालकिांविरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार दंड आकारण्यात आला.- हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस