शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

८,४४० वाहनधारकांना विनाकारण फिरणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची कारवाई : ६६७ वाहने जप्त; मोजावी लागली १० लाखांवर दंडाची रक्कम

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना घराबाहेर पळू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहे. तरीही नियमांची पायमल्ली सुरू असल्याची बाब पोलिसांनी केलेल्या वाहनधारकांवरील कारवाईतून दिसून येते. वाहतुक नियंत्रण शाखेने २४ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविली. यामध्ये तब्बल ८ हजार ४४० वाहनांवर कारवाई केली असून दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे. यामध्ये ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.लॉसकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. तरीही काही वाहनधारक विनाकारण घराबाहे पडत आहे. अशांवर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस नाकाबंदीदरम्यान कसून तपास करीत आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजार ४४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.4034 अनपेड कारवाईवाहतूक पोलिसांनी महिनाभरात आठ हजार ४४० कारवाई केल्या. यामध्ये चार हजार ४०६ पेड कारवाईमध्ये दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर चार हजार ३४ अनपेड कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतील दंड १५ दिवसांच्या आत भरण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या आहेत. तर ६६७ वाहने जप्त केली आहेत.वाहनचालकांचे समुपदेशनकोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये, घरीच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा शब्दात वाहनचालकांना समुपदेशन करण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.292 जमावबंदीच्या कारवायाकोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. त्यानुसार कलम १८८ अन्वये आतापर्यंत २९२ कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा धोका असल्याने कुणीही विनाकारण बाहेर निघू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र अनेकजण उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा वाहन चालकिांविरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार दंड आकारण्यात आला.- हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस