शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

८९ रब्बी गावे झाली खरीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा निर्णय : आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत. मात्र सद्य:स्थितीत रब्बी हंगामासाठी घोषित असलेल्या ८९ गावांमध्ये दोन तृतीयांश टक्क्यापेक्षा जास्त खरीप पिके घेतली जातात. त्यामुळे अशा गावांना खरीप गावाच्या सवलती मिळू शकत नाही. त्यामुळे सदर ८९ गावे रब्बी मधून खरीपात रुपांतरण करण्यात आली आहेत. याबाबत काही आक्षेप असल्यास संबधित तहसिल कार्यालयाकडे १० आॅगस्टपर्यंत लेखी स्वरुपात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.खरिपात समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील चांदा रै., गोंविंदपूर रिठ, बोर रिठ, वडगाव, दे.गो.रै. दूगार्पूर, ऊर्जानगर, नेरी, रानवेडली, कोंडीमाल, कोंढीचक, आंबोरा, लखमापूर, चांदसुर्ला, चकबोर्डा, चकवलणी, चकनिंबाळा, वायगाव चक नं.१, अजयपूर, गोंडसावरी, निलजई, अडेगाव, किटाळी, चिंचोली, वढोली, मसाळा रिठ, चिंचाळा, उमरी रिठ, गवराळा, चारगाव, छोटा नागपूर, विचोडा रै, विचोडा बु. पडोली, दाताळा, कोसारा, खुटाळा, देवाडा, चोराळा, शिवणी चोर, हिगनाळा व आरवट अशी ४२ गावे आहेत.तर चिमूर तालुक्यातील भिवकुंड, खापरी जां, माकोना, तळोधी गावगन्ना, दलदली रिठ, पेढरी भागडे, टेकेपार रिठ, खापरी, पेढरी तु. नवीन नवेगाव, मासाळ खूर्द, वडसी, वाघेडा, टाकी रिठ, खापरी मजरा, सिरसपूर, निमढेला रिठ, सोनेगाव गांवडे अशी १८ गावे, बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, हडस्ती, चारवट, माना, बल्लारपूर, विसापूर, कळमना, जोगापूर, आष्टी, दहेली, लावारी, आमडी, आसेगाव, कोठारी, खामतुर्ली व काटवली असे १६ गावे, मुल तालुक्यामधील खंडाळा रै, कोरंबी, बोरघाट चक, बोरघाट माल, म्हसबोडण, चक दहेगाव व कन्हाळगाव अशी ७ गावे आणि सावली तालुक्यातील आकापूर, गेवरा चक, पेंढरी चक, वढोली गांडली, चक वढोली व मोवाड चक या ६ अशा ८९ गावांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.