शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

८९ रब्बी गावे झाली खरीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा निर्णय : आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील १८३६ गावांपैकी १७४७ गावे खरीप हंगामासाठी तर ८९ गावे रब्बी हंगामाची म्हणून महसूल विभागाने घोषित केली आहेत. मात्र सद्य:स्थितीत रब्बी हंगामासाठी घोषित असलेल्या ८९ गावांमध्ये दोन तृतीयांश टक्क्यापेक्षा जास्त खरीप पिके घेतली जातात. त्यामुळे अशा गावांना खरीप गावाच्या सवलती मिळू शकत नाही. त्यामुळे सदर ८९ गावे रब्बी मधून खरीपात रुपांतरण करण्यात आली आहेत. याबाबत काही आक्षेप असल्यास संबधित तहसिल कार्यालयाकडे १० आॅगस्टपर्यंत लेखी स्वरुपात सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.खरिपात समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील चांदा रै., गोंविंदपूर रिठ, बोर रिठ, वडगाव, दे.गो.रै. दूगार्पूर, ऊर्जानगर, नेरी, रानवेडली, कोंडीमाल, कोंढीचक, आंबोरा, लखमापूर, चांदसुर्ला, चकबोर्डा, चकवलणी, चकनिंबाळा, वायगाव चक नं.१, अजयपूर, गोंडसावरी, निलजई, अडेगाव, किटाळी, चिंचोली, वढोली, मसाळा रिठ, चिंचाळा, उमरी रिठ, गवराळा, चारगाव, छोटा नागपूर, विचोडा रै, विचोडा बु. पडोली, दाताळा, कोसारा, खुटाळा, देवाडा, चोराळा, शिवणी चोर, हिगनाळा व आरवट अशी ४२ गावे आहेत.तर चिमूर तालुक्यातील भिवकुंड, खापरी जां, माकोना, तळोधी गावगन्ना, दलदली रिठ, पेढरी भागडे, टेकेपार रिठ, खापरी, पेढरी तु. नवीन नवेगाव, मासाळ खूर्द, वडसी, वाघेडा, टाकी रिठ, खापरी मजरा, सिरसपूर, निमढेला रिठ, सोनेगाव गांवडे अशी १८ गावे, बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, हडस्ती, चारवट, माना, बल्लारपूर, विसापूर, कळमना, जोगापूर, आष्टी, दहेली, लावारी, आमडी, आसेगाव, कोठारी, खामतुर्ली व काटवली असे १६ गावे, मुल तालुक्यामधील खंडाळा रै, कोरंबी, बोरघाट चक, बोरघाट माल, म्हसबोडण, चक दहेगाव व कन्हाळगाव अशी ७ गावे आणि सावली तालुक्यातील आकापूर, गेवरा चक, पेंढरी चक, वढोली गांडली, चक वढोली व मोवाड चक या ६ अशा ८९ गावांचा समावेश आहे, असे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.