शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

शेतकऱ्यांना हवे नुकसान भरपाईसाठी ६८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली.

ठळक मुद्देपीक पंचनामे पूर्ण : जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे अहवाल सादर

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. सर्व १५ तालुक्यातील पीक नुकसानाच्या पंचनामा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाला. त्यानुसार ९७ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी विभागीय आयुक्तांच्या वतीने जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ६८ कोटींची मागणी केली आहे.पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनामार्फत ३० आॅक्टोबरपासून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांद्वावारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अंतिम अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ९७ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.सहा तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र ९७ हजार ८६२ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वरोरा, चिमूर, कोरपना, राजुरा, चंद्रपूर व सावली तालुक्यात झाल्याचे अंतिम अहवालात नमुद करण्यात आले. कापूस, सोयाबीन व भात उत्पादक शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाकडून मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पीक विम्यासाठी ११ हजार शेतकऱ्यांचे अर्जखरीप हंगामातील पिकांचा विमा काढणाºया लाखो शेतकऱ्यांपैकी मंगळवारपर्यंत केवळ ११ हजार शेतकºयांनी विमा क्लेमसाठी विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले. नुकसानीचा पंचनामा करताना विमा कपंनीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाही तर कृषी विभागाकडून केलेला पंचनामा विमा कंपनीला मान्य करावा लागेल, असा आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती