शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवे नुकसान भरपाईसाठी ६८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली.

ठळक मुद्देपीक पंचनामे पूर्ण : जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे अहवाल सादर

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. सर्व १५ तालुक्यातील पीक नुकसानाच्या पंचनामा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाला. त्यानुसार ९७ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी विभागीय आयुक्तांच्या वतीने जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ६८ कोटींची मागणी केली आहे.पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनामार्फत ३० आॅक्टोबरपासून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांद्वावारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अंतिम अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ९७ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.सहा तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र ९७ हजार ८६२ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वरोरा, चिमूर, कोरपना, राजुरा, चंद्रपूर व सावली तालुक्यात झाल्याचे अंतिम अहवालात नमुद करण्यात आले. कापूस, सोयाबीन व भात उत्पादक शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाकडून मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पीक विम्यासाठी ११ हजार शेतकऱ्यांचे अर्जखरीप हंगामातील पिकांचा विमा काढणाºया लाखो शेतकऱ्यांपैकी मंगळवारपर्यंत केवळ ११ हजार शेतकºयांनी विमा क्लेमसाठी विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले. नुकसानीचा पंचनामा करताना विमा कपंनीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाही तर कृषी विभागाकडून केलेला पंचनामा विमा कंपनीला मान्य करावा लागेल, असा आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती