पाच वर्षात ४६ जणांचा बळी
By Admin | Updated: December 16, 2014 22:49 IST2014-12-16T22:49:12+5:302014-12-16T22:49:12+5:30
जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक

पाच वर्षात ४६ जणांचा बळी
मानव-वन्यप्राणी संघर्ष : वाघ-बिबट हल्ल्यात ३५ जणांनी गमावला जीव
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटला आहे. गेल्या पाच वर्षात हिस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांना जीव गमवावा लागला असून या घटनांवर अद्यापही आळा घालता आलेला नाही. त्यामुळे जंगली भागातील नागरिक भीतीत जीवन जगत आहेत.
वन्यप्राणी गावात प्रवेश करून जनावरांवर हल्ले, सरपन गोळा करणाऱ्या, शेतकाम करणाऱ्या अनेकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला आहे. त्यामुळे नागरिक जंगलात एकट्याने जाण्यास धजावत आहेत. वनविभाग वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून नागरिकांना जंगलात जाण्यापासून सावध करीत आहे. परंतु वन्यप्राणी हल्ल्याच्या घटना कमी झालेल्या नाही. २०१० ते डिसेंबर २०१४ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४६ जणांचा बळी गेला आहे. यात ३५ घटना वाघ व बिबट हल्ल्याच्या आहेत. तर रान डुक्कराच्या हल्ल्यात सहा, अस्वल एक व रानगवा प्राण्याच्या हल्ल्यात एकाचा जीव गेला आहे. यामध्ये काही मृतकाच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख, पाच लाख तर एका कुटुंबाला केवळ एक लाख रूपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. दोन मृतांची ओळख पटली नाही. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा ठार झालेल्यांच्या कुटुंबाला वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र, विविध कागदपत्राची पुर्तता करावी लागत असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे मृताच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.
सरत्या वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे. यात तीन रानडुक्कर, एक अस्वल व पाच घटना वाघ हल्ल्याच्या आहेत. या घटनांतील सर्व मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात घरचा कर्ता व्यक्ती गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्नन त्यांच्या समोर असून भविष्यात मानव-वन्यप्राणी संघर्षातून कोणतीही जीवीत हानी होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.