शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

३४ पैकी ३२ पाणवठे कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 23:48 IST

जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली.

ठळक मुद्देताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : ९६.७० चौ. किमी मूल वनपरिक्षेत्रातील प्रकार

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली. यात मूल वनपरिक्षेत्रातील ९६.७० चौ. किमी. क्षेत्र जंगल राखीव ठेवण्यात आले. यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी ३४ पाणवठे निर्माण करण्यात आले. मात्र गतवर्षी कमी पाऊस पडल्याने ३४ पैकी केवळ दोनच पाणवठ्यात सध्यास्थितीत पाणी आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असून गावाकडे धाव घेत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाच्या २२ आॅगस्ट २०१२ च्या परिपत्रकानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना करण्यात आली. विभागीय वनाअधिकारी चंद्रपूर वनविभागाअंतर्गत पाच परिक्षेत्र निर्माण करण्यात आले. यात चंद्रपूर, चिचपल्ली, वरोरा, भद्रावती, सावली तर बफर मध्ये सहा परिक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. यात चंद्रपूर (बफर), शिवणी, पळसगाव, मूल, मोहुर्ली, खडसंगीचा समावेश करण्यात आला. मूल वनपरिक्षेत्र ९६.७० चौ. कि.मी. क्षेत्रात असून या परिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वनविभाग वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी संवेदनशिल आहे.जंगलात वन्यप्राण्यांना मुक्तपणे संचार करता यावा व पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध रहावा यासाठी नैसर्गिक व स्वनिर्मीत पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. यात मारोडा येथे पाच, भादुर्णी ११, फुलसटी- ५, जानाळा- ३, डोनी ५, कारवन ३ व करवन येथे दोन पाणवठे निर्माण करण्यात आले. मात्र सध्यास्थिती केवळ दोनच पाणवठ्यात पाणी उपलब्ध आहे. फुलसरी व डोनी या दोन क्षेत्रात सौरपंप बसविण्यात आल्याने दिवसभर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी पाणवठ्यात जमा होत असते.फुलझरी व डोनी या जंगलव्याप्त क्षेत्रात विद्युत व्यवस्था नसल्याने सौरपंप पाणवठ्यासाठी वरदान ठरु पाहत आहे. मात्र इतर पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन वर्षापूर्वी पाणवठ्यात टँकरने कृत्रिम पद्धतीने पाणी पुरविल्या जात होते. यावर्षी पाणी टंचाईच्या काळात मात्र वनविभागाचे अधिकारी व प्राणी मित्र यांचे समन्वयक नसल्याने पाणवठे कोरडे पडले आहेत.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल परिक्षेत्रातील डोनी व फुलझरी येथील दोनच पाणवठ्यात सौरपंपामुळे पाणी उपलब्ध आहे. याचबरोबर सोमनाथ, भादुर्णी, मारोडा, येथील नैसर्गिक तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांची सध्यातरी पाण्यासाठी भटकंती होणार नाही.- एस.जे. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूलताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रात उन्हाळ्याच्या दिवसात आटलेल्या पाणवठ्यात टँकरने पाणी पुरविले जात होते. मात्र वनविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. डोनी व फुलझरी या दोनच पाणवठ्यावर वन्यप्राण्यांना अवलंबून राहावे लागत आहे.- उमेश झिरे, प्राणी मित्र, मूल.